शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

औरंगाबादेत राज्यस्तरीय दिगंबर जैन संमेलनात ५०० भावी वधू-वरांचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:44 AM

अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सैतवाल दिगंबर जैन वधू-वर परिचय संमेलनात जवळपास २०० युवक व ३०० युवतींनी आपला परिचय करुन दिला. उद्योजक किंवा व्यापारी नवराही चालेल, असा कल या संमेलनात युवतींमध्ये दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सैतवाल दिगंबर जैन वधू-वर परिचय संमेलनात जवळपास २०० युवक व ३०० युवतींनी आपला परिचय करुन दिला. उद्योजक किंवा व्यापारी नवराही चालेल, असा कल या संमेलनात युवतींमध्ये दिसून आला.औरंगाबाद येथील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन रिसोड येथील उदयकुमार जोगी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुंबई येथील महावीर घोडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून महामंत्री रमेश रणदिवे, अध्यक्ष जिनदास मोगले, मुख्य प्रवर्तक मंगलाताई गोसावी, कार्याध्यक्ष दिगंबरराव वायकोस, विलास जोगी, गणेश खोबरे, राहुल जोगी आदींची उपस्थिती होती.आचार्य आर्यनंदीजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने संमेलनास प्रारंभ झाला. प्रारंभी या वधू-वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष जिनदास मोगले व पाहुण्यांनी संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश सांगून राज्यभरातून आलेल्या युवक, युवतींसह त्यांच्या पालकांचे स्वागत केले व जास्तीत जास्त विवाह जुळून यावेत, यासाठी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर बोलावून युवक व युवतींनी आपला परिचय करुन दिला. त्यामुळे रेशीमगाठी जुळण्याची ‘लगीनघाई’ दिवसभर येथे दिसली.काही युवकांनी घर, आई-वडिलांचा सांभाळ करणारी अनुरुप भावी पत्नी असावी तर काहींनी नोकरीवाली व उच्चशिक्षित युवतींना पसंती दर्शविली. काही युवतींनी निर्व्यसनी, व्यापारी, धार्मिक तर काही युवतींनी उच्चशिक्षित व नोकरीवाल्या भावी पतीला पसंती दाखविली. व्यापारी किंवा उद्योजक पतीला प्रथमच युवतींनी पसंती दर्शविली, हा चांगला बदल यावेळी दिसला. यामुळे हा मेळ जमविण्यासाठी आलेल्या युवक, युवतींसह पालक एकमेकांच्या भेटीगाठी घेत होते. कार्यक्रमासाठी परिचय संमेलनाच्या पदाधिकाºयांसह शोभाताई देशमाने, ज्योती मोगले, ऋषाली जोगी, संदीप वायकोस, सतीश जोगी, ममता अंबेकर, मीनाक्षी उदगीरकर, अजय वायकोस आदींनी परिश्रम घेतले. अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे राष्टÑीय अध्यक्ष दिलीप घेवारे यांनी भावी वधू-वरांना शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त विवाह लावण्याचे आवाहन केले. कार्याध्यक्ष डी.डी. वायकोस यांनी आभार मानून आगामी संमेलनात जास्तीत जास्त विवाह जुळवून साधेपणाने लग्नसोहळे साजरे करण्याचे आवाहन केले.