शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला ग्रामीण पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:02 IST

महागडा चारा विकत घेऊन जगविलेली जनावरे चोरटे पळवित असल्याने बळीराजाची झोप उडाली होती.

औरंगाबाद: शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेल्यी बैल, म्हशी चोरीचे गुन्हे करून शेतकऱ्यांची झोप उडविणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला ग्रामीण गुन्हेशाखा पोलिसांनीअटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत विविध ठिकाणाहून चोरलेली जनावरे विक्री केल्याची कबुली दिली. आरोपींचे चार साथीदार पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बाळू उर्फ सोमनाथ उमाजी माळी (वय ३१,रा. गोपाळवस्ती, ता. गेवराई, जि. बीड),ज्ञानेश्वर उर्फ  माऊली श्रावण माळी, (वय २४),  अविनाश उर्फ अवि फु लसिताराम जाधव(२४(रा. बेलगाव,ता.गेवराई )  ,सोपान उर्फ गोट्या अशोक धनगर(वय२०,रा. रामनगर तांडा, ता. गेवराई,जि.बीड)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या आरोपींची अन्य चार साथीदार पसार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे म्हणाले की, लाडगाव येथील  अशोक साळुबा बागल यांच्या शेतातील गोठ्यातून तीन बैल चोरट्यांनी २४ मे रोजी रात्री चोरून नेले होते.याविषयी बागल यांनी करमाड ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथील रंगनाथ नारायण कोंडके यांच्या शेतातील बैल २४ मे रोजी रात्री चोरीला गेले होते. याविषयी कोंडके यांनी वडोदबाजार ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. तर तिसऱ्या घटनेत पैठण तालुक्यातील बोकुडजळगाव येथील योगेश लहू लोखंडे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवलेल्या दोन म्हशी चोरीला गेल्या होत्या. 

महागडा चारा विकत घेऊन जगविलेली जनावरे चोरटे पळवित असल्याने बळीराजाची झोप उडाली होती. ही बाब पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी याविषयी कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक  भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, कर्मचारी विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, संजय काळे, सागर पाटील, गणेश गांगवे, राहुल पगारे, रामेश्वर धापसे, योगेश तारमळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांच्या पथकाने तपास केला तेव्हा ही जनावरे आरोपी बाळू माळीच्या टोळीने चोरल्याचे त्यांना समजले. यानंतर पोलिसांनी बाळू माळी आणि त्याच्या तीन साथीदारांना विविध ठिकाणाहून अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत लाडगाव येथील शेतातून जनावरे चोरल्याचे सांगितले. तसेच अन्य साथीदार रमेश होणाजी सावंत, रमेश माळी, रामा गव्हाणे आणि भाऊसाहेब धनगर यांच्या मदतीने अन्य विविध ठिकाणची जनावरे चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून एक बैल, रोख रक्कम, वाहने नेण्यासाठी वापरलेले मालवाहू वाहन,मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद