शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जायकवाडी धरणातून आतापर्यंत ७४ टीएमसी विसर्ग, तर १२५ टीएमसी झाली आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 20:12 IST

सोडलेल्या पाण्यात जायकवाडी ऐवढे आणखी एक धरण ७५% भरले असते यावरून धरणातून किती पाणी सोडण्यात आले याचा अंदाज येऊ शकतो. 

- संजय जाधवपैठण (औरंगाबाद) : गेल्या ४१ दिवसापासून जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात येत असून आतापर्यंत ७४ टीएमसी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली. हंगामात सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात धरणातून एवढे पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून अद्यापही विसर्ग सुरू असल्याने यंदा धरणातून सर्वाधिक विसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

जायकवाडी धरण कसे भरेल ? या चिंतेत  मधल्या काही वर्षात मराठवाड्यातील जनतेला पोखरले होते. जायकवाडीच्या पाण्यासाठी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असा संघर्षही पहावयास मिळाला . परंतु, गेल्या चार वर्षांपासून धरण काठोकाठ भरत असल्याने मराठवाड्यास दिलासा मिळाला आहे. यंदातर धरणात येणारी आवक व विसर्ग या आधीचे सर्वच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. १०२.७३ टीएमसी जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात यंदा १ जून पासून ३५५९.७४ दलघमी (१२५.७० टीएमसी) पाण्याची आवक झाली.

या पैकी २०८६.३२ दलघमी (७४ टीएमसी ) पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. सोडलेल्या पाण्यात जायकवाडी ऐवढे आणखी एक धरण ७५% भरले असते यावरून धरणातून किती पाणी सोडण्यात आले याचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान धरणातून सांडव्याद्वारे ( गेट) ६७.१२ टीएमसी, जलविद्युत केंद्रातून ३.४६टीएमसी, उजव्या कालव्यातून २.६२ टीएमसी व डाव्या कालव्यातून ०.४७ टीएमसी असा एकूण ७४ टीएमसी विसर्ग करण्यात आल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण व विजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान २०२१ मध्ये ४९ टीएमसी, २०२० मध्ये ८१ टीएमसी, २०१९ मध्ये ९५ टीएमसी व २०१७ मध्ये ९.८८ टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात आले आहे. सोमवारी धरणाचे १८ दरवाजे १ फुटाने वर उचलून २०३६४ क्युसेक्स विसर्ग सुरू असून धरणात ९७.४७% जलसाठा झालेला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीRainपाऊस