शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

समृद्धी महामार्गालगत १८ ठिकाणी होणार इंडस्ट्रियल टाऊनशिप; पहिला टप्पा मराठवाड्यात

By बापू सोळुंके | Updated: December 10, 2024 18:51 IST

पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात चार इंडस्ट्रियल टाऊनशिप उभारण्यात आला आहे

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गालगत १८ इंडस्ट्रियल टाऊनशिप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात चार टाऊनशिप उभारण्यात येत असून, या सर्व जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील आहेत. प्रस्तावित टाऊनशिपच्या जागांची पाहणी नुकतीच एमआयडीसी आणि एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई औद्योगिक पार्कला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. औद्योगिक वसाहतींमधील तयार माल विदेशात पाठविणे आणि विदेशातून कच्चा माल औद्योगिक वसाहतीपर्यंत पोहोचविण्यासाठी समृद्धी महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही बाब लक्षात घेऊन समृद्धी महामार्गालगत १८ ठिकाणी इंडस्ट्रियल टाऊनशिप शासनाने प्रस्तावित केल्या आहेत. नवीन सरकार आल्यामुळे पहिल्या टप्प्यात चार इंडस्ट्रियल टाऊनशिप छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत उभारल्या जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हडस पिंपळगाव, लासूर, वैजापूर तालुक्यातील जांबरगाव तसेच कोपरगाव तालुक्यातील धोत्रा नोड यात वैजापूर तालुक्यातील बापतारा, पुरणगाव आणि लाखगंगा या गावांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील देऊळगाव राजा रोडवरील जांभूळ अशा या चार इंडस्ट्रियल नोडचा समावेश आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटछत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील प्रस्तावित चार इंडस्ट्रियल टाऊनशिपच्या जागांची पाहणी एमआयडीसीच्या डेप्युटी सीईओ सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने गत सप्ताहात केली. प्रत्येक साईटमध्ये ६०० ते ७०० हेक्टर जमीन घेतली जाणार आहे. यातील किती जमीन शासनाची आहे आणि किती शेतकऱ्यांकडून घ्यावी लागेल, याची माहिती घेण्यात आली.

पाण्याची व्यवस्था कशी होईल?अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रस्तावित चार इंडस्ट्रियल टाऊनशिपला पाणी कोठून उपलब्ध होऊ शकते, याची शहानिशा केली. गंगापूर तालुक्यातील लासूरजवळील हडस पिंपळगाव आणि वैजापूर जांबरगाव या टाऊनशिपला जायकवाडी प्रकल्पाच्या बॅकवॉटरमधून तर धोत्रा नोडला नांदूर, मधमेश्वर प्रकल्पातून पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे दिसून आले.

शेतकऱ्यांकडून दहा वर्षे भाड्याने जमीनकोणतीही औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जमिनीची गरज असते. नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांशी थेट सौदा करून जमीन घ्यावी लागते. यावर मोठी रक्कम शासनाला खर्च करावी लागते. हा खर्च करावा लागू नये, यासाठी या टाऊनशिपमध्ये शेतकऱ्यांची जमीन दहा वर्षांसाठी भाड्याने घ्यावी आणि त्यानंतर त्यांच्या संपादित जमिनीच्या ३० टक्के क्षेत्राचा विकसित भूखंड त्यांना परत करण्याची संकल्पना असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र, याला शेतकऱ्यांकडून कितपत प्रतिसाद मिळतो, यावरच या नवीन टाऊनशिपचे भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMIDCएमआयडीसी