शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
7
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
8
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
9
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
10
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
11
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
12
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
13
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
15
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
16
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
17
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
18
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
19
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
20
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधींकडून विमानतळावर उमेदवारी मिळवलेले अशोकराव डोणगांवकर काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:10 IST

सरपंचपदापासून मंत्रिपदापर्यंत वाटचाल करणारे जेष्ठ नेते अशोकराव राजाराम पाटील डोणगांवकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

छत्रपती संभाजीनगर : जेष्ठ नेते, माजी मंत्री अशोकराव राजाराम पाटील डोणगांवकर यांचे आज, शनिवारी ( दि. ५) सकाळी ११.५७ वाजता वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार उद्या, ६ जुलै रोजी त्यांच्या मूळगावी डोणगांव, ता. गंगापूर येथे सकाळी ११ वाजता होणार आहेत. त्यांच्या जाण्याने मराठवाड्यातील राजकारण, शिक्षण व विकासाची एक तेजस्वी वाटचाल थांबली आहे.

इंदिरा गांधींनी दिलेले ‘विमानतळ तिकीट’ ठरले आयुष्याचे वळणबिंदू१९७७ मध्ये डोणगांव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली. त्याच सुमारास वाळूज सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली. पण त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे १९८० साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी विमानतळावर झालेली ऐतिहासिक भेट. इंदिराजींनी त्यांची नेमकी कामगिरी पाहून त्यांना तिथेच काँग्रेसचे विधानसभा तिकीट जाहीर केले. आणि ते गंगापुर-खुलताबाद मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

राजकारणातून विकासाचे ध्येय गाठणारा नेता१९८० ते १९८५ या कार्यकाळात त्यांनी गंगापुर-खुलताबाद तालुक्याच्या विकासासाठी क्रांतिकारी कामे केली. एस.टी. डेपो, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नवीन तहसील कार्यालये, तसेच तालुक्याला जोडणारे मुख्य रस्ते, वीज, पाणी योजना यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. १९९५ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येताना त्यांनी महाराष्ट्रात युती सरकार स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून काम करताना त्यांनी नांदूर-मधमेश्वर कालव्याला चालना दिली, नागपूर-मुंबई महामार्ग, गंगापुर-भेंडाळा रस्ता आणि घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना यांसारख्या प्रकल्पांना वेग दिला.

शिक्षणप्रेमातून उभा राहिला ग्रामीण शिक्षणाचा आधार१९८२ मध्ये त्यांनी मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पाया रचला. १९८३ साली लासुर स्टेशन येथे मुलींसाठी पहिले कन्या विद्यालय सुरू केले. आज या संस्थेच्या १० पेक्षा जास्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये गंगापुर आणि खुलताबाद तालुक्यात यशस्वीपणे कार्यरत आहेत. १९९० मध्ये त्यांनी भगीरथी शिक्षण संस्था सुरू केली. दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले गेले. शिक्षणाविषयी त्यांची दृष्टी केवळ संस्थाचालकापुरती मर्यादित नव्हती, तर तो एक समाजप्रबोधनाचा प्रकल्प होता.

सामाजिक व राजकीय वारशाचा मोठा परिवारत्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई डोणगांवकर, भाऊ रमेश पाटील (जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन), मुलगा किरण पाटील (जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष), आमदार मुलगी मोनिकाताई राजळे, मुलगा राहुल डोणगांवकर, मुलगी वैशाली सावंत व नातवंडे असा मोठा परिवार आहे, जो त्यांचा सामाजिक वारसा पुढे नेत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsarpanchसरपंचsocial workerसमाजसेवक