शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

इंदिरा गांधींकडून विमानतळावर उमेदवारी मिळवलेले अशोकराव डोणगांवकर काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:10 IST

सरपंचपदापासून मंत्रिपदापर्यंत वाटचाल करणारे जेष्ठ नेते अशोकराव राजाराम पाटील डोणगांवकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

छत्रपती संभाजीनगर : जेष्ठ नेते, माजी मंत्री अशोकराव राजाराम पाटील डोणगांवकर यांचे आज, शनिवारी ( दि. ५) सकाळी ११.५७ वाजता वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार उद्या, ६ जुलै रोजी त्यांच्या मूळगावी डोणगांव, ता. गंगापूर येथे सकाळी ११ वाजता होणार आहेत. त्यांच्या जाण्याने मराठवाड्यातील राजकारण, शिक्षण व विकासाची एक तेजस्वी वाटचाल थांबली आहे.

इंदिरा गांधींनी दिलेले ‘विमानतळ तिकीट’ ठरले आयुष्याचे वळणबिंदू१९७७ मध्ये डोणगांव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली. त्याच सुमारास वाळूज सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली. पण त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे १९८० साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी विमानतळावर झालेली ऐतिहासिक भेट. इंदिराजींनी त्यांची नेमकी कामगिरी पाहून त्यांना तिथेच काँग्रेसचे विधानसभा तिकीट जाहीर केले. आणि ते गंगापुर-खुलताबाद मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

राजकारणातून विकासाचे ध्येय गाठणारा नेता१९८० ते १९८५ या कार्यकाळात त्यांनी गंगापुर-खुलताबाद तालुक्याच्या विकासासाठी क्रांतिकारी कामे केली. एस.टी. डेपो, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नवीन तहसील कार्यालये, तसेच तालुक्याला जोडणारे मुख्य रस्ते, वीज, पाणी योजना यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. १९९५ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येताना त्यांनी महाराष्ट्रात युती सरकार स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून काम करताना त्यांनी नांदूर-मधमेश्वर कालव्याला चालना दिली, नागपूर-मुंबई महामार्ग, गंगापुर-भेंडाळा रस्ता आणि घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना यांसारख्या प्रकल्पांना वेग दिला.

शिक्षणप्रेमातून उभा राहिला ग्रामीण शिक्षणाचा आधार१९८२ मध्ये त्यांनी मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पाया रचला. १९८३ साली लासुर स्टेशन येथे मुलींसाठी पहिले कन्या विद्यालय सुरू केले. आज या संस्थेच्या १० पेक्षा जास्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये गंगापुर आणि खुलताबाद तालुक्यात यशस्वीपणे कार्यरत आहेत. १९९० मध्ये त्यांनी भगीरथी शिक्षण संस्था सुरू केली. दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले गेले. शिक्षणाविषयी त्यांची दृष्टी केवळ संस्थाचालकापुरती मर्यादित नव्हती, तर तो एक समाजप्रबोधनाचा प्रकल्प होता.

सामाजिक व राजकीय वारशाचा मोठा परिवारत्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई डोणगांवकर, भाऊ रमेश पाटील (जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन), मुलगा किरण पाटील (जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष), आमदार मुलगी मोनिकाताई राजळे, मुलगा राहुल डोणगांवकर, मुलगी वैशाली सावंत व नातवंडे असा मोठा परिवार आहे, जो त्यांचा सामाजिक वारसा पुढे नेत आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsarpanchसरपंचsocial workerसमाजसेवक