शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

असुविधांची ‘हद्द’वाढ !

By admin | Updated: January 23, 2015 00:56 IST

बीड : २०११ मध्ये नगरपरिषद क्षेत्राचा विस्तार झाला. हद्दवाढीमुळे पालिकेशी जोडल्या गेलेल्या शहरानजीकच्या रहिवाशांच्या आशा पल्लवित झाल्या

बीड : २०११ मध्ये नगरपरिषद क्षेत्राचा विस्तार झाला. हद्दवाढीमुळे पालिकेशी जोडल्या गेलेल्या शहरानजीकच्या रहिवाशांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, तीन वर्षानंतरही या वस्त्यांपर्यंत नागरी सुविधा पोहोचल्याच नाही. इतकेच काय;पण; वीज, पथदिवे, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसाठीचा संघर्ष अजून संपलेला नाही.शहराची हद्द वाढली;पण तुलनेने विकास झाला नाही. त्यामुळे पालिकेने असुविधांची ‘हद्द’ केली, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हद्दवाढीतील भागांमध्ये गुरूवारी ‘लोकमत’ने स्पॉट रिपोर्टिंग केले़ त्याचाच हा आढावा़आमच्याकडून सर्व सोयीसुविधा पुरविण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत़ रस्ते, नाल्या, वीज, पाणी या नागरी सुविधांना अधिक प्राधान्य देत आहोत़ नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी आम्ही टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे़ यावर संपर्क साधून आपल्या तक्रारींची दखल घेत मार्गी लावण्या येतील़- श्रीकृष्ण भालसिंग, मुख्याधिकारीशहरातील चक्रधरनगर हा भाग समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. वीज, नाल्या, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांचाची येथे वाणवा आहे. नाल्या तर नाहीतच. प्रत्येकाच्या घरापुढे पाण्याचे डोह साचले आहेत. विद्युत तारा लोंबकळलेल्या आहेत. रस्ते धड नसल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. सिमेंट रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात़ उपाययोजना होत नाहीत़ तक्रारींची दखल घेतली जात नाही, असा पाढा रहिवाशांनी वाचला़नरसोबानगराला घाणीचा विळखा; आरोग्य धोक्यातनरसोबानगरात कचरा टाकण्यासाठी कुंडीच नाही. नागरिक उघड्या भूखंडांवरच कचरा फेकून नागरिक मोकळे होतात. त्यामुळे डुकरांसह मोकाट गुरांचाही मुक्त संचार आहे. नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या गरजेच्या आहेत;परंतु अद्याप नाल्याही झाल्या नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी डबके साचले आहेत. परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळू लागले असून आरोग्य धोक्यात आहे़अंधारामुळे चोरांचा सुळसुळाटगयानगर, शिंदेनगर, गया इस्टेट परिसरात पथदिवे नाहीत. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवरही अंधार असतो. त्यामुळे या भागात चोरांना मोकळे रान आहे. पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्री-अपरात्री जीव मुठीत धरून जावे लागते. सायंकाळी सातनंतर महिला घराबाहेर पडत नाहीत. अंधाराचा फायदा घेऊन छेडछाडही होते. त्यामुळे पथदिव्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी आहे. या भागातील रस्त्यांचीही अतिशय वाईट स्थिती आहे़ मोठमोठे खड्डे पडल्याने पायी चालणेही जिकरीचे बनले आहे़ त्यामुळे अनेकजण रस्ता बदलून जाणे पसंत करतात़एकनाथनगरात बाराही महिने पाण्याचा ठणठणाटएकनाथनगर भागात झपाट्याने वसाहत वाढत आहे. मात्र, या भागात अद्याप नळजोडण्या नाहीत. त्यामुळे बोअरच्या क्षीरयुक्त पाण्यावरच बाराही महिने तहान भागवावी लागते. नळपट्टी मात्र न चुकता वसूल केली जाते. नळाचे पाणीच नाही तर नळपट्टी का द्यायची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भागांत नाल्या कुठे झाल्या तर कुठे नाही. त्यामुळे रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागते. राजीव गांधी चौकापासून जोडलेल्या रस्त्याचे काम झाले;पण दोन्ही बाजूच्या पट्ट्यांचे काम रखडलेलेच आहे.