४ कोटी खर्चुनही अशुद्ध पाणीपुरवठा

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:17:00+5:302014-06-14T01:20:23+5:30

हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी गावास जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी ९२ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे़

Incorrect supply of water after expenditure of 4 crore | ४ कोटी खर्चुनही अशुद्ध पाणीपुरवठा

४ कोटी खर्चुनही अशुद्ध पाणीपुरवठा

हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी गावास जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी ९२ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे़ मात्र नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ गावची लोकसंख्या १२ हजारांवर आहे़
जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या हंडरगुळी गावात मोठी बाजारपेठ आहे़ त्यामुळे येथे व्यापारी व शेतकऱ्यांची नेहमी वर्दळ असते़ गावाला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाने २००८-०९ मध्ये जलशुुद्धीकरण व पाणीपुरवठा योजनेसाठी ३ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले़ तिरू प्रकल्पावरून ही योजना कार्यान्वित आहे़ कसेबसे तीन-चार वर्षे रेंगाळत या योजनेचे काम पूर्णत्वाकडे नेले़ त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केली़ या योजनेच्या माध्यमातून नवीन जलकुंभ, पाईपलाईन, तिरू प्रकल्पात उर्ध्वविहिर, गावाशेजारी जलशुद्धकीरण केंद्र बांधण्यात आले़
जलधुध्दीकरण यंत्र बसविल्यावरही शुद्ध पाणी मिळत नसल्याची ग्रामस्थांतून ओरड आहे़ बहुतांश ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप, आड, विहिर, विंधन विहिर आदीचा आधार घेत आहेत़ नळाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करता सांडपाणी म्हणून केला जात आहे़ अशातच ग्रामपंचायतीने २०११ पासून पाणीपट्टी ३० वरून ८० रूपयावर वाढ केल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे़
यासंदर्भात विस्तार अधिकारी ए़पी़पाटील म्हणाले, वर्षभरापासून फिल्टर बंद आहे़ त्यामुळे पाणी गढूळ येत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे़ याप्रकरणी जिल्हा परिषदेकडे आपण अहवाल पाठविला आहे़ तसेच तक्रारकर्त्यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे़ (वार्ताहर)
वर्षभरानंतर प्रशासनाकडून दखल
हंडरगुळी गावाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार गावातील प्रा़ शिवाजी माने, रमाकांत लांडगे, संजय काळवणे यांनी पंचायत समितीकडे केली होती़ तक्रार देऊन वर्ष संपल्यावर उदगीर पंचायत समितीच्या पथकाने नुकतीच गावाला भेट देऊन पाणी नमुने घेतले आहेत़ सध्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विंधन विहिरी व खासगी विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे़ पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढली असली तरी जलशुद्धीकरण करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे़

Web Title: Incorrect supply of water after expenditure of 4 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.