शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
3
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
4
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
5
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
8
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
9
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
10
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
11
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
12
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
14
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
15
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
16
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
17
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
18
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
19
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
20
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल

फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटो बायोग्राफी छत्रपती संभाजीनगरात

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 9, 2024 19:37 IST

फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटोबायोग्राफी; देशातील एकमेव ‘भारतमाता मंदिर’ छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : ‘‘कशास आई भिजिवसी डोळे, उजळ तुझेभाळ,रात्रीच्या गर्भात उद्याचा, असे उष:काल

सरणावरती आज आमुची, पेटताच प्रेतेउठतील या ज्वाळातून, भावी क्रांतीचे नेते

लोहदंड तव पायामधले, खळाखळा तुटणार आईखळाखळा तुटणार, गर्जा जयजयकार क्रांतीचा’’

भारतमातेला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी ज्या क्रांतिवीरांनी आपले बलिदान दिले. त्यांची शौर्य गाथा अशा वरील शब्दांत ‘भारतामाता मंदिरात लिहून ठेवली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशावर चढले, त्यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले अशा देशातील निवडक १०० क्रांतिवीरांचे फोटो व माहिती असणारे हे ‘क्रांतिवीरांचे मंदिर’ (भारतमाता मंदिर) देशातील एकमेव ठरत आहे. मात्र, योग्य प्रचार-प्रसार होत नसल्याने याची माहिती पर्यटक सोडा शहरातील सर्व नागरिकांपर्यंतही पोहोचली नाही.

क्रांतिवीर राणी चन्नमा ते राजेंद्र लाहिरीपर्यंतभारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा कुणी केला असेल तर त्या राणी चन्नमाने. १८२४ला कनार्टकातील कित्तूरचे संस्थान इंग्रजांनी ताब्यात घेताच. त्याविरुद्ध पुरुषवेश परिधान करुन, इंग्रजांवर तुटून पडणाऱ्या या महान राणीने शेकडो इंग्रजांना कंठस्नान घातले. त्यांना दि. ३ डिसेंबर १८२४ इंग्रजांनी शिक्षा देत तोफेच्या तोंडी दिले. या पहिल्या फोटोपासून ते राजेंद्र लाहिरी ते रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिसंघटनेत होते. त्यांनी अनेक क्रांतियोजना यशस्वी केल्या. त्यांना दि. १७ डिसेंबर १९२४ रोजी गोंडा येथे फाशी देण्यात आली. या १०० वर्षांतील १०० क्रांतिकारकांच्या फोटोसह माहिती ‘भारतमाता मंदिर’मध्ये बघण्यास मिळते. येथे भारतमातेची मोठी मूर्ती सर्वांचे लक्षवेधून घेते.

प्रत्येक शहरवासीयांनी ‘प्रचारक’ बनण्याची गरजस्वातंत्र्याला ५० वर्षेपूर्ण झाल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने भारतमाता मंदिर उभारण्यात आले. या मंदिराला. येत्या डिसेंबर महिन्यात २५व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या मंदिराची मूळ संकल्पना माजी नगरसेवक संजय जोशी यांची. त्यांनी वर्षभर तिहार जेल, येरवडा जेल व नागपूर जेलमध्ये जाऊन तिथून क्रांतिवीरांचे फोटो जमा केले व विविध ऐतिहासिक पुस्तक वाचून त्यातून माहिती मिळविली. दरवर्षी १४ ते १५ हजार लोक या मंदिराला भेट देतात. भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक शहरवासीयाने पहिले हे भारतमाता मंदिर बघावे त्यांतर त्याचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन संजय जोशी यांनी केले.

शहरावासीयांनी काय करायला पाहिजे?१) भारतमाता मंदिरात शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन यावी.२) बाहेरील शाळांच्या सहली येथे येतील यासाठी प्रयत्न करावे.३) एमटीडीसीने देश-विदेशांतील पर्यटकांच्या नियोजनात या भारतमाता मंदिराचा समावेश करावा.४) शहरातील सामाजिक संस्था, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने मंदिराला भेट द्यावी.५) शहरावासीयांनी आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आवर्जून हे मंदिर दाखवावे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका