शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटो बायोग्राफी छत्रपती संभाजीनगरात

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 9, 2024 19:37 IST

फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटोबायोग्राफी; देशातील एकमेव ‘भारतमाता मंदिर’ छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : ‘‘कशास आई भिजिवसी डोळे, उजळ तुझेभाळ,रात्रीच्या गर्भात उद्याचा, असे उष:काल

सरणावरती आज आमुची, पेटताच प्रेतेउठतील या ज्वाळातून, भावी क्रांतीचे नेते

लोहदंड तव पायामधले, खळाखळा तुटणार आईखळाखळा तुटणार, गर्जा जयजयकार क्रांतीचा’’

भारतमातेला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी ज्या क्रांतिवीरांनी आपले बलिदान दिले. त्यांची शौर्य गाथा अशा वरील शब्दांत ‘भारतामाता मंदिरात लिहून ठेवली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशावर चढले, त्यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले अशा देशातील निवडक १०० क्रांतिवीरांचे फोटो व माहिती असणारे हे ‘क्रांतिवीरांचे मंदिर’ (भारतमाता मंदिर) देशातील एकमेव ठरत आहे. मात्र, योग्य प्रचार-प्रसार होत नसल्याने याची माहिती पर्यटक सोडा शहरातील सर्व नागरिकांपर्यंतही पोहोचली नाही.

क्रांतिवीर राणी चन्नमा ते राजेंद्र लाहिरीपर्यंतभारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा कुणी केला असेल तर त्या राणी चन्नमाने. १८२४ला कनार्टकातील कित्तूरचे संस्थान इंग्रजांनी ताब्यात घेताच. त्याविरुद्ध पुरुषवेश परिधान करुन, इंग्रजांवर तुटून पडणाऱ्या या महान राणीने शेकडो इंग्रजांना कंठस्नान घातले. त्यांना दि. ३ डिसेंबर १८२४ इंग्रजांनी शिक्षा देत तोफेच्या तोंडी दिले. या पहिल्या फोटोपासून ते राजेंद्र लाहिरी ते रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिसंघटनेत होते. त्यांनी अनेक क्रांतियोजना यशस्वी केल्या. त्यांना दि. १७ डिसेंबर १९२४ रोजी गोंडा येथे फाशी देण्यात आली. या १०० वर्षांतील १०० क्रांतिकारकांच्या फोटोसह माहिती ‘भारतमाता मंदिर’मध्ये बघण्यास मिळते. येथे भारतमातेची मोठी मूर्ती सर्वांचे लक्षवेधून घेते.

प्रत्येक शहरवासीयांनी ‘प्रचारक’ बनण्याची गरजस्वातंत्र्याला ५० वर्षेपूर्ण झाल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने भारतमाता मंदिर उभारण्यात आले. या मंदिराला. येत्या डिसेंबर महिन्यात २५व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या मंदिराची मूळ संकल्पना माजी नगरसेवक संजय जोशी यांची. त्यांनी वर्षभर तिहार जेल, येरवडा जेल व नागपूर जेलमध्ये जाऊन तिथून क्रांतिवीरांचे फोटो जमा केले व विविध ऐतिहासिक पुस्तक वाचून त्यातून माहिती मिळविली. दरवर्षी १४ ते १५ हजार लोक या मंदिराला भेट देतात. भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक शहरवासीयाने पहिले हे भारतमाता मंदिर बघावे त्यांतर त्याचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन संजय जोशी यांनी केले.

शहरावासीयांनी काय करायला पाहिजे?१) भारतमाता मंदिरात शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन यावी.२) बाहेरील शाळांच्या सहली येथे येतील यासाठी प्रयत्न करावे.३) एमटीडीसीने देश-विदेशांतील पर्यटकांच्या नियोजनात या भारतमाता मंदिराचा समावेश करावा.४) शहरातील सामाजिक संस्था, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने मंदिराला भेट द्यावी.५) शहरावासीयांनी आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आवर्जून हे मंदिर दाखवावे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका