शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाला चाऱ्यापेक्षा पाणीटंचाईच्या अधिक झळा

By विजय सरवदे | Updated: March 11, 2024 11:48 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३.४२ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. दुसरीकडे, पशुधनासाठी पाच- सहा महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असला तरी पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा त्यांना बसणार आहेत.

जि. प. पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या टंचाई कृती आराखड्यानुसार जूनपर्यंत जिल्ह्यातील ९०२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासणार असून यापैकी ६२६ गावांत पिण्याच्या पाण्यासाठी ८३५ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. यामध्ये जनावरांचे मोठे हाल होणार आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट- सप्टेंबरमध्येच उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यानुसार येणाऱ्या पाच- सहा महिने तरी जनावरांना चाराटंचाईची फारशी झळ बसणार नाही. एकंदरीत सर्व उपाययोजनांनुसार २३ लाख ४२ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झालेला आहे. यामध्ये खरीप हंगामात १२ लाख ६८ हजार मेट्रिक टन, तर रब्बी हंगामात ४ लाख ४ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला आहे. तसेच नैसर्गिक स्रोतांपासून २ लाख १७ हजार मेट्रिक टन चारा निर्माण झाला आहे. याशिवाय पशुसंवर्धन विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे १ लाख ४१ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला आहे. यासाठी ८ हजार ६१० शेतकऱ्यांना वैरणीचे ६०२.७० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले होते. एवढेच नाही, तर ३ लाख १२ हजार मेट्रिक टन मुरघास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चाराटंचाईपेक्षा यंदा जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे.

जिल्ह्यात जनावरांची स्थितीमोठी जनावरे- ४ लाख ७४ हजार ७५२लहान जनावरे- १ लाख ५८ हजार २५१शेळी- मेंढी- ५ लाख १९ हजार ४२६

जनावरांना लागणारा चाराजिल्ह्यातील एकूण ६ लाख ३३ हजार जनावरांना दरदिवशी वाळलेला चारा ३ हजार ८४३ मेट्रिक टन एवढा लागतो, तर महिन्याकाठी हा चारा १ लाख १५ हजार २८१ मेट्रिक टन लागतो.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाईAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद