शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुधनाला चाऱ्यापेक्षा पाणीटंचाईच्या अधिक झळा

By विजय सरवदे | Updated: March 11, 2024 11:48 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३.४२ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर : यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. दुसरीकडे, पशुधनासाठी पाच- सहा महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असला तरी पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा त्यांना बसणार आहेत.

जि. प. पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या टंचाई कृती आराखड्यानुसार जूनपर्यंत जिल्ह्यातील ९०२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासणार असून यापैकी ६२६ गावांत पिण्याच्या पाण्यासाठी ८३५ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. यामध्ये जनावरांचे मोठे हाल होणार आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट- सप्टेंबरमध्येच उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यानुसार येणाऱ्या पाच- सहा महिने तरी जनावरांना चाराटंचाईची फारशी झळ बसणार नाही. एकंदरीत सर्व उपाययोजनांनुसार २३ लाख ४२ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झालेला आहे. यामध्ये खरीप हंगामात १२ लाख ६८ हजार मेट्रिक टन, तर रब्बी हंगामात ४ लाख ४ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला आहे. तसेच नैसर्गिक स्रोतांपासून २ लाख १७ हजार मेट्रिक टन चारा निर्माण झाला आहे. याशिवाय पशुसंवर्धन विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे १ लाख ४१ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला आहे. यासाठी ८ हजार ६१० शेतकऱ्यांना वैरणीचे ६०२.७० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले होते. एवढेच नाही, तर ३ लाख १२ हजार मेट्रिक टन मुरघास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चाराटंचाईपेक्षा यंदा जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे.

जिल्ह्यात जनावरांची स्थितीमोठी जनावरे- ४ लाख ७४ हजार ७५२लहान जनावरे- १ लाख ५८ हजार २५१शेळी- मेंढी- ५ लाख १९ हजार ४२६

जनावरांना लागणारा चाराजिल्ह्यातील एकूण ६ लाख ३३ हजार जनावरांना दरदिवशी वाळलेला चारा ३ हजार ८४३ मेट्रिक टन एवढा लागतो, तर महिन्याकाठी हा चारा १ लाख १५ हजार २८१ मेट्रिक टन लागतो.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाईAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद