शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतरस्त्यांची ‘वाट’ बिकट; कामांना गती मिळेना, १४७१ पैक्की आतापर्यंत फक्त ३१ कामे पूर्ण

By विजय सरवदे | Updated: July 22, 2023 16:16 IST

यंदाही शेतकऱ्यांना शेतरस्त्यांच्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : अपुरा निधी तसेच मजुरांकडून कामांची मागणी होत नसल्यामुळे जिल्ह्यात पाणंद रस्त्यांची ‘वाट’ बिकट झाली आहे. यंदा प्रशासकीय मान्यता मिळालेल्या १४७१ कामांपैकी आजपर्यंत फक्त ३१ कामे पूर्ण होऊ शकली. आता पावसाचे दिवस असल्यामुळे पर्यायाने या रस्त्यांची कामे थांबवावी लागणार आहेत. परिणामी, यंदाही शेतकऱ्यांना शेतरस्त्यांच्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मातोश्री ग्रामसमृद्धी शेत आणि पाणंद रस्ते योजनेसाठी जिल्ह्यात यंदा २ हजार ४३६ पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली. यापैकी आतापर्यंत १४७१ रस्ते कामांना तांत्रिक, प्रशासकीय मान्यता मिळाली. विशेष म्हणजे, या कामांसाठी कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. त्यानंतरही सुमारे ९०० कामे अद्याप लटकलेली आहेत.

या कामांसाठी अवघा २८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दुसरीकडे, रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात या कामांची गती मंदावली. आतापर्यंत अख्खा उन्हाळा गेला, तरी अवघे ३६.५ किलोमीटर लांबीच्या ३१ रस्त्यांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली आहेत. उर्वरित सुरू झालेल्या ५४१ कामांपैकी किती रस्ते पावसाळ्यात होतील, याचे उत्तर प्रशासकीय यंत्रणेकडेही नाही.

पाणंद रस्ते म्हणजे काय?शेतशिवारात जाणाऱ्या पारंपरिक रस्त्यांना ‘पाणंद’ म्हणतात. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्त्याची गरज आहे. त्यामुळे शेतातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतरस्ता किंवा पाणंद रस्ता आवश्यक असतो. अनेकदा पावसामुळे हे रस्ते वाहून जातात. त्यामुळे शेतापर्यंत ट्रॅक्टर किंवा अन्य यंत्रसामग्री नेणे, तयार झालेला शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेणे कठीण जाते, हे लक्षात घेऊन शासनाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्त्याची योजना अमलात आणली आहे.

रस्ते कामांवर संपाचा परिणाममध्यंतरीच्या काळात गटविकास अधिकारी तसेच ग्रामरोजगार सेवकांच्या संपामुळे जिल्ह्यात १४७१ कामांना कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही ९०० कामे रखडली आहेत. अलीकडे मजुरांकडूनही कामांसाठी मागणी नाही. या सर्व अडचणींवर मात करत कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सध्या ५७२ कामे सुरू असून ती लवकरच पूर्ण होतील.- अनुपमा नंदनवनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो)

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद