शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

छत्रपती संभाजीनगरात पासपोर्टच्या ऑनलाईन नोंदणीनंतर मुलाखतीसाठी दीड महिना 'थांबा'

By साहेबराव हिवराळे | Updated: June 20, 2024 19:12 IST

दिवसाला ८० जणांच्या अर्जाची पडताळणी : पंधरा दिवसांत पासपोर्ट येतो घरी

छत्रपती संभाजीनगर : आपले शहर आता स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जत आहे. परंतु पासपोर्टसाठी नागरिकांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर दीड महिना मुलाखतीसाठी थांबावे लागत आहे. कागदपत्रांत त्रुटी नसल्यास १५ दिवसांत पासपोर्ट घरी येतो, अशी हमी पोस्टाच्या पासपोर्ट सेवा केंद्राने दिली आहे.

पासपोर्ट काढण्यासाठी पूर्वी मुंबई, नाशिकला जावे लागत होते. टपाल कार्यालयाने ही अडचण लक्षात घेऊन येथे सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राला अत्यंत चांगला प्रतिसाद असून, उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणारे विद्यार्थी तसेच उद्योजक यांना पासपोर्ट सेवा अगदी स्वत: ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी केल्यावर मोबाईलवर मुलाखतीची तारीख आणि वेळ देखील येतो.

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रेजन्मतारीख पुरावा (कागदपत्रांपैकी कोणतेही एक) तपशील असाजन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, हस्तांतरण प्रमाणपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी पेन्शन ऑर्डर, शासन सेवा आदेश, एलआयसी प्रमाणपत्र, तसेच पाणी बिल, टेलिफोन (लँडलाइन किंवा पोस्ट पेड मोबाईल बिल), वीज बिल, आयकर मूल्यांकन आदेश, निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र, गॅस कनेक्शनचा पुरावा, लेटर हेडवर नामांकित कंपन्यांच्या नियोक्त्याकडून प्रमाणपत्र.

पत्त्याचा पुरावा (कागदपत्रांपैकी कोणतेही दोन)जोडीदाराच्या पासपोर्टची प्रत (कौटुंबिक तपशिलांसह पहिले आणि शेवटचे पान), (अर्जदाराचा सध्याचा पत्ता जोडीदाराच्या पासपोर्टमध्ये नमूद केलेल्या पत्त्याशी जुळत असल्यास)पालकांच्या पासपोर्टची प्रत, अल्पवयीन मुलांच्या बाबतीत (पहिले आणि शेवटचे पृष्ठ), आधार कार्ड, नोंदणीकृत भाडे करार, चालू बँक खात्याचे फोटो पासबुक (अनुसूचित सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील भारतीय बँका आणि केवळ प्रादेशिक ग्रामीण बँका) १० वी, १२ वी किंवा पदवी प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. 

सेतू केंद्रात अजून काही सेवासुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. त्या पूर्ण केल्यास दीड महिन्याची प्रतीक्षा कमी होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpassportपासपोर्ट