शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात पासपोर्टच्या ऑनलाईन नोंदणीनंतर मुलाखतीसाठी दीड महिना 'थांबा'

By साहेबराव हिवराळे | Updated: June 20, 2024 19:12 IST

दिवसाला ८० जणांच्या अर्जाची पडताळणी : पंधरा दिवसांत पासपोर्ट येतो घरी

छत्रपती संभाजीनगर : आपले शहर आता स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जत आहे. परंतु पासपोर्टसाठी नागरिकांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर दीड महिना मुलाखतीसाठी थांबावे लागत आहे. कागदपत्रांत त्रुटी नसल्यास १५ दिवसांत पासपोर्ट घरी येतो, अशी हमी पोस्टाच्या पासपोर्ट सेवा केंद्राने दिली आहे.

पासपोर्ट काढण्यासाठी पूर्वी मुंबई, नाशिकला जावे लागत होते. टपाल कार्यालयाने ही अडचण लक्षात घेऊन येथे सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राला अत्यंत चांगला प्रतिसाद असून, उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणारे विद्यार्थी तसेच उद्योजक यांना पासपोर्ट सेवा अगदी स्वत: ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी केल्यावर मोबाईलवर मुलाखतीची तारीख आणि वेळ देखील येतो.

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रेजन्मतारीख पुरावा (कागदपत्रांपैकी कोणतेही एक) तपशील असाजन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, हस्तांतरण प्रमाणपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी पेन्शन ऑर्डर, शासन सेवा आदेश, एलआयसी प्रमाणपत्र, तसेच पाणी बिल, टेलिफोन (लँडलाइन किंवा पोस्ट पेड मोबाईल बिल), वीज बिल, आयकर मूल्यांकन आदेश, निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र, गॅस कनेक्शनचा पुरावा, लेटर हेडवर नामांकित कंपन्यांच्या नियोक्त्याकडून प्रमाणपत्र.

पत्त्याचा पुरावा (कागदपत्रांपैकी कोणतेही दोन)जोडीदाराच्या पासपोर्टची प्रत (कौटुंबिक तपशिलांसह पहिले आणि शेवटचे पान), (अर्जदाराचा सध्याचा पत्ता जोडीदाराच्या पासपोर्टमध्ये नमूद केलेल्या पत्त्याशी जुळत असल्यास)पालकांच्या पासपोर्टची प्रत, अल्पवयीन मुलांच्या बाबतीत (पहिले आणि शेवटचे पृष्ठ), आधार कार्ड, नोंदणीकृत भाडे करार, चालू बँक खात्याचे फोटो पासबुक (अनुसूचित सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील भारतीय बँका आणि केवळ प्रादेशिक ग्रामीण बँका) १० वी, १२ वी किंवा पदवी प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. 

सेतू केंद्रात अजून काही सेवासुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. त्या पूर्ण केल्यास दीड महिन्याची प्रतीक्षा कमी होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpassportपासपोर्ट