शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

मराठवाड्यातील २ हजार गावांमध्ये पावसाचा खंड, जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी

By विकास राऊत | Updated: August 29, 2023 12:14 IST

अटींमुळे विमा संरक्षण रक्कम मिळण्यातही अडचणी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ५३४ मंडळांपैकी तब्बल १०३ मंडळांमध्ये पावसाने २१ पेक्षा जास्त दिवसांचा खंड दिला. एका मंडळात सरासरी १८ ते २० गावांचा समावेश असून, २ हजार गावांतील खरीप हंगामातील पिके संकटात आली. सप्टेंबरमध्ये पाऊस पडला नाही, तर पेरण्यांसाठी केलेली गुंतवणूक निघेल एवढेही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाही.

एल निनोचा परिणाम विभागातील पर्जन्यमानावर झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४८.४३ टक्के पाऊस झाला. ८५ पैकी ५२ दिवस कोरडेच तर ३३ दिवस पाऊस झाला. ३८ महसूल मंडळांत २५ ते ५० टक्केच पाऊस झाला. २०६ महसूल मंडळांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला. एकूण ५३४ महसूल मंडळांपैकी १०३ मंडळांमध्ये २१ पेक्षा जास्त दिवसांचा खंड पावसाने दिला. यामध्ये सर्वाधिक ३१ मंडळांत येणारी ६२० गावे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. लातूर जिल्ह्यातील २७ मंडळांतील ५४० तर औरंगाबाद जिल्ह्यातील १५ मंडळांतील ३०० गावे, जालना जिल्ह्यातील ८ मंडळांतील १६० गावे आणि बीड जिल्ह्यातील ११ मंडळांतील २२० गावांत २१ दिवसांपासून खंड आहे. नांदेड, हिंगोली वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांवर दुष्काळी संकट आहे. ४८.५७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४८.२३ लाख हेक्टरवर या वर्षी पेरणी झाली. यात सोयाबीन ५३ टक्के, कापूस २८ टक्के, तूर ७ टक्के, मका ५, उडीद २, मूग २ तर बाजरी दीड टक्के क्षेत्रावर पेरली.

अटीचा अडथळाकमी पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून २५ टक्के रक्कम विमा संरक्षित रक्कम देण्याची तरतूद आहे. मात्र, यासाठी पावसाच्या २१ दिवस खंडाची अट आहे. ३७ तालुक्यांतील १०३ महसूल मंडळे येतात. काही मंडळांत २० दिवस पाऊस पडला नाही आणि एक दिवस केवळ पावसाची रिमझिम होताच शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. शासनाने १ रुपयांत पीकविमा योजना आणल्याने यंदा मराठवाड्यातील ७० लाख २७ हजार ९३५ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला.

जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणीमराठवाड्यातील मोठ्या जलप्रकल्पात ४२ टक्के, मध्यम प्रकल्पात २२, लघू प्रकल्पात २१ असा साधारणत: ३५ टक्के पाणीसाठा आहे. धाराशिव, लातूर, परभणी जिल्ह्यांतील काही भागांत एक ते दोन मीटरपर्यंत भूजलपातळी खाली आली आहे. ३२ नगरपालिका क्षेत्रांमध्ये सरासरी तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर या वर्षी ८४ टँकर १०० हून अधिक गावांत सुरू आहेत.

तीन महिने पुरेल एवढाच चाराविभागात दररोज २५ हजार मे. टन चाऱ्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत २१ लाख ७७ हजार मे. टन चारा उपलब्ध असल्याचा आकडा आहे. हा चारा ८५ दिवस पुरेल. विभागात ४८ लाख ६१ हजार जनावरे आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी