शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

मराठवाड्यातील २ हजार गावांमध्ये पावसाचा खंड, जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी

By विकास राऊत | Updated: August 29, 2023 12:14 IST

अटींमुळे विमा संरक्षण रक्कम मिळण्यातही अडचणी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ५३४ मंडळांपैकी तब्बल १०३ मंडळांमध्ये पावसाने २१ पेक्षा जास्त दिवसांचा खंड दिला. एका मंडळात सरासरी १८ ते २० गावांचा समावेश असून, २ हजार गावांतील खरीप हंगामातील पिके संकटात आली. सप्टेंबरमध्ये पाऊस पडला नाही, तर पेरण्यांसाठी केलेली गुंतवणूक निघेल एवढेही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाही.

एल निनोचा परिणाम विभागातील पर्जन्यमानावर झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४८.४३ टक्के पाऊस झाला. ८५ पैकी ५२ दिवस कोरडेच तर ३३ दिवस पाऊस झाला. ३८ महसूल मंडळांत २५ ते ५० टक्केच पाऊस झाला. २०६ महसूल मंडळांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला. एकूण ५३४ महसूल मंडळांपैकी १०३ मंडळांमध्ये २१ पेक्षा जास्त दिवसांचा खंड पावसाने दिला. यामध्ये सर्वाधिक ३१ मंडळांत येणारी ६२० गावे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. लातूर जिल्ह्यातील २७ मंडळांतील ५४० तर औरंगाबाद जिल्ह्यातील १५ मंडळांतील ३०० गावे, जालना जिल्ह्यातील ८ मंडळांतील १६० गावे आणि बीड जिल्ह्यातील ११ मंडळांतील २२० गावांत २१ दिवसांपासून खंड आहे. नांदेड, हिंगोली वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांवर दुष्काळी संकट आहे. ४८.५७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४८.२३ लाख हेक्टरवर या वर्षी पेरणी झाली. यात सोयाबीन ५३ टक्के, कापूस २८ टक्के, तूर ७ टक्के, मका ५, उडीद २, मूग २ तर बाजरी दीड टक्के क्षेत्रावर पेरली.

अटीचा अडथळाकमी पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून २५ टक्के रक्कम विमा संरक्षित रक्कम देण्याची तरतूद आहे. मात्र, यासाठी पावसाच्या २१ दिवस खंडाची अट आहे. ३७ तालुक्यांतील १०३ महसूल मंडळे येतात. काही मंडळांत २० दिवस पाऊस पडला नाही आणि एक दिवस केवळ पावसाची रिमझिम होताच शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. शासनाने १ रुपयांत पीकविमा योजना आणल्याने यंदा मराठवाड्यातील ७० लाख २७ हजार ९३५ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला.

जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणीमराठवाड्यातील मोठ्या जलप्रकल्पात ४२ टक्के, मध्यम प्रकल्पात २२, लघू प्रकल्पात २१ असा साधारणत: ३५ टक्के पाणीसाठा आहे. धाराशिव, लातूर, परभणी जिल्ह्यांतील काही भागांत एक ते दोन मीटरपर्यंत भूजलपातळी खाली आली आहे. ३२ नगरपालिका क्षेत्रांमध्ये सरासरी तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर या वर्षी ८४ टँकर १०० हून अधिक गावांत सुरू आहेत.

तीन महिने पुरेल एवढाच चाराविभागात दररोज २५ हजार मे. टन चाऱ्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत २१ लाख ७७ हजार मे. टन चारा उपलब्ध असल्याचा आकडा आहे. हा चारा ८५ दिवस पुरेल. विभागात ४८ लाख ६१ हजार जनावरे आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी