शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

मराठवाड्यातील २ हजार गावांमध्ये पावसाचा खंड, जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी

By विकास राऊत | Updated: August 29, 2023 12:14 IST

अटींमुळे विमा संरक्षण रक्कम मिळण्यातही अडचणी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ५३४ मंडळांपैकी तब्बल १०३ मंडळांमध्ये पावसाने २१ पेक्षा जास्त दिवसांचा खंड दिला. एका मंडळात सरासरी १८ ते २० गावांचा समावेश असून, २ हजार गावांतील खरीप हंगामातील पिके संकटात आली. सप्टेंबरमध्ये पाऊस पडला नाही, तर पेरण्यांसाठी केलेली गुंतवणूक निघेल एवढेही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाही.

एल निनोचा परिणाम विभागातील पर्जन्यमानावर झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४८.४३ टक्के पाऊस झाला. ८५ पैकी ५२ दिवस कोरडेच तर ३३ दिवस पाऊस झाला. ३८ महसूल मंडळांत २५ ते ५० टक्केच पाऊस झाला. २०६ महसूल मंडळांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला. एकूण ५३४ महसूल मंडळांपैकी १०३ मंडळांमध्ये २१ पेक्षा जास्त दिवसांचा खंड पावसाने दिला. यामध्ये सर्वाधिक ३१ मंडळांत येणारी ६२० गावे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. लातूर जिल्ह्यातील २७ मंडळांतील ५४० तर औरंगाबाद जिल्ह्यातील १५ मंडळांतील ३०० गावे, जालना जिल्ह्यातील ८ मंडळांतील १६० गावे आणि बीड जिल्ह्यातील ११ मंडळांतील २२० गावांत २१ दिवसांपासून खंड आहे. नांदेड, हिंगोली वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांवर दुष्काळी संकट आहे. ४८.५७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४८.२३ लाख हेक्टरवर या वर्षी पेरणी झाली. यात सोयाबीन ५३ टक्के, कापूस २८ टक्के, तूर ७ टक्के, मका ५, उडीद २, मूग २ तर बाजरी दीड टक्के क्षेत्रावर पेरली.

अटीचा अडथळाकमी पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून २५ टक्के रक्कम विमा संरक्षित रक्कम देण्याची तरतूद आहे. मात्र, यासाठी पावसाच्या २१ दिवस खंडाची अट आहे. ३७ तालुक्यांतील १०३ महसूल मंडळे येतात. काही मंडळांत २० दिवस पाऊस पडला नाही आणि एक दिवस केवळ पावसाची रिमझिम होताच शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. शासनाने १ रुपयांत पीकविमा योजना आणल्याने यंदा मराठवाड्यातील ७० लाख २७ हजार ९३५ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला.

जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणीमराठवाड्यातील मोठ्या जलप्रकल्पात ४२ टक्के, मध्यम प्रकल्पात २२, लघू प्रकल्पात २१ असा साधारणत: ३५ टक्के पाणीसाठा आहे. धाराशिव, लातूर, परभणी जिल्ह्यांतील काही भागांत एक ते दोन मीटरपर्यंत भूजलपातळी खाली आली आहे. ३२ नगरपालिका क्षेत्रांमध्ये सरासरी तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर या वर्षी ८४ टँकर १०० हून अधिक गावांत सुरू आहेत.

तीन महिने पुरेल एवढाच चाराविभागात दररोज २५ हजार मे. टन चाऱ्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत २१ लाख ७७ हजार मे. टन चारा उपलब्ध असल्याचा आकडा आहे. हा चारा ८५ दिवस पुरेल. विभागात ४८ लाख ६१ हजार जनावरे आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी