शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

हायब्रीड जातींनी संपविले ‘फूल आणि फुलांवरील भ्रमरांचे नाते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:36 AM

ना कोणता सुगंध, ना त्यामध्ये कोणता मकरंद...

ठळक मुद्देगुलाब फुलांपासून दूर जात आहेत, भ्रमर आणि इतर कीटकमहाराष्ट्रात गावरान गुलाबासाठी पोषक वातावरण नाही.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : ‘व्हॅलेंटाईन डे’ची सगळ्यात सोपी, सुंदर आणि स्वस्तातील भेट म्हणजे गुलाबाची फुले. या फु लांमुळे दोन प्रेमी जीव एकत्र येत असले तरी ‘फूल आणि फुलांवरील भ्रमर’ हे नाते मात्र कायमचे दुरावत आहे. ना कोणता सुगंध, ना त्यामध्ये मकरंद. यामुळे बागेत फुललेले शेकडो हायब्रीड गुलाब पाहूनही बिचाऱ्या भ्रमराची परिस्थिती मात्र ‘दुरून फुले साजिरे’ अशीच आहे.

गावराण गुलाब आता बघायलाही मिळत नसल्यामुळे गुलाबालाही सुगंध असतो, हे येणारी पिढी कदाचित विसरूनही जाईल. वरवर बघता हा प्रकार अगदी किरकोळ वाटत असला, तरी याचा दूरगामी परिणाम फुलांवर वाढणारे भ्रमर, मधमाशा आणि पराग कणांचे सिंचन करणाऱ्या कीटकांच्या अनेक जाती- प्रजाती यांच्यावर होतो आहे. हा एक अतिसुक्ष्म रुपातील पर्यावरणीय परिणाम आहे, असे पर्यावरण अभ्यासक सांगतात. फुले आणि त्यातही गुलाबांच्या फुलांना कायमच मागणी असते. गावरान गुलाबासाठी १५ डिग्री सेल्सिअस इतके कमी तापमान लागते. त्यामुळे महाराष्ट्रात गावरान गुलाबासाठी पोषक वातावरण नाही. म्हणूनच वाढती मागणी आणि पुरवठा यात समतोल साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हायब्रीड गुलाब वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हॅलेंटाईन डे, लग्नसराई, सणासुदीचे दिवस या काळात तर मागणी खूप जास्त वाढलेली असते. त्यामुळे एका गुलाबासाठी साधारण १५ ते २० रुपये एवढी किंमत मोजावी लागते.

रसायनांचा अधिक मारागावरान गुलाब हा कोणत्याही औषधाविना येतो. मात्र त्याचे आयुष्य कमी असल्यामुळे  आज बाजारात ८० ते ९० टक्के हायब्रीड  गुलाबच दिसतो आहे. आपल्या पुढच्या पिढीला गावरान गुलाब कदाचित बघताही येणार नाही. रसायनांच्या वापरामुळे हायब्रीड गुलाब जास्त टिकतात. पण रसायनांच्या अतिवापरामुळे या फुलांमधील मकरंद गावरान फुलांप्रमाणे नसतो. त्यामुळे भुंगे किंवा अन्य कीटकांचा त्यावर निभाव लागणे शक्य होत नाही. रसायनयुक्त मकरंद मधमाशांसाठी प्राणघातक ठरतो. शास्त्रज्ञ आइनस्टाईनच्या मते मधमाशा नष्ट झाल्या तर अवघ्या चार वर्षांत मानवी जात नष्ट होऊ शकते, यावरून या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येते.                    - मिलिंद गिरधारी

भ्रमरांचा रसभंगहायब्रीड गुलाबांमध्ये इसेन्शिअल अ‍ॅरोमॅटिक आॅईलच्या ग्लॅण्डस् एकतर नसतात किंवा मग फार कमी असतात. मकरंद कमी असतो. त्यामुळे पराग सिंचन करणारे  कीटक याठिकाणी येत नाहीत. आले तरी आॅईल आणि मकरंद न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास होतो. हायब्रीड फुले फक्त  शोभिवंत असतात. त्यातून त्यांना काहीही मिळत नाही. पण मराठवाड्यातील तापमान आणि आजची फु लांची गरज पाहता, हायब्रीड फुले लावणे गरजेचे झाले आहे. - प्रा. अरविंद धाबे 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र