शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

प्रेमविवाहानंतर जर्मनीत जाताच पतीची नियत फिरली;पत्नीच्या हत्येचा प्रयत्न,एकटीला सोडून पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 12:29 IST

दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर मुलीच्या आई-वडिलांनी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करून २८ जून २०१८ रोजी धुमधडाक्यात लग्न लावून दिले.

औरंगाबाद : महाविद्यालयीन शिक्षण घेताना दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात अन् नंतर विवाहात झाले. ती जर्मनीत पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी जाताना तिच्या नावावर कर्ज घेऊन पाठवणी केली. तिचा पतीही काही दिवसातच जर्मनीत शिक्षण घेण्यासाठी गेला. त्या ठिकाणी काही दिवस एकत्र राहिल्यानंतर त्याने तिला मारहाण, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ऐन कोराेनाच्या काळात हा प्रकार घडला. यातच तो एप्रिल २०२१ रोजी तिला सोडून दुसऱ्याच शहरात निघून गेला. त्यानंतर परतलाच नाही. तिने भारतात आल्यानंतर जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

आरोपींमध्ये पती वैभव अनिल राजकारणे, सासरा अनिल मोरेश्वर राजकारणे (रा. एन ५, सावरकरनगर) आणि एका महिलेचा समावेश आहे. जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलगी बी.टेक. आणि मुलगा मेकॅनिकल अभियांत्रिकीत पदवीचे शिक्षण घेताना दोघात मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले. दोघांनीही आयुष्यभराची साथ निभावण्याचा निर्णय घेत कुटुंबीयांना तसे सांगितले. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर मुलीच्या आई-वडिलांनी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करून २८ जून २०१८ रोजी धुमधडाक्यात लग्न लावून दिले. लग्नानंतर काही दिवसातच नवरा, सासू आणि सासऱ्याने तिचा छळ सुरू केला. हा छळ सुरू असतानाच तिला पदव्युत्तरचे शिक्षण घेण्यासाठी जर्मनीतील फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फायनान्स ॲण्ड मॅनेजमेंटमध्ये संधी मिळाली. त्यासाठी सासऱ्याने तिचे जबरदस्तीने बँक डिटेल्स, स्टेटमेंट घेऊन शिक्षणासाठी ३३ लाख रुपये कर्ज काढले. कर्ज घेऊन ती १५ सप्टेंबर २०१८ रोजी उच्च शिक्षणासाठी जर्मनीत गेली. त्यानंतर काही दिवसातच पती वैभव हा सुद्धा शिक्षणासाठी जर्मनीत गेला. जानेवारी २०१९ मध्ये पत्नीला भेटला. त्यावेळी त्याला पत्नीने कौटुंबिक जबाबदारी घेण्याची विनंती केली. तेव्हा वैभवने पत्नीला तोंड फुटेपर्यंत मारहाण केली.

यानंतर एप्रिल व जून २०१९ मध्ये पुन्हा पत्नीला भेटला. तेव्हाही मारहाण करून निघून गेला. जुलै २०२० मध्ये दोघेही फ्रँकफर्ट येथे एकत्र राहू लागले. तिने खर्च भागविण्यासाठी शिक्षण घेतानाच तात्पुरती नोकरी सुरू केली. त्यातून घरभाडे आणि दोघांचा खर्च भागत होता. डिसेंबर २०२० मध्ये वैभवच्या व्हिसाची मुदत संपत असल्यामुळे, नूतनीकरणासाठी सहा हजार युरो (पाच लाख रु.) खर्च येणार होता. तो माहेरी पैसे मागण्यासाठी जबरदस्ती करीत होता. तिने नकार देताच बेदम मारहाण केली. त्याविषयी सासू, सासऱ्यांना कळविले असता, त्यांनीही मुलाचीच बाजू घेत सुनेला शिवीगाळ केली. यानंतर एप्रिल २०२१ मध्ये वैभव पत्नीला सोडून जर्मनीतील दुसऱ्याच शहरात राहण्यास गेला. त्याचा शोध घेतला, मात्र तो अद्यापपर्यंत सापडलाच नाही. त्याने पत्नीशी संबंध तोडून टाकले. सप्टेंबर २०२१ मध्ये ती भारतात परतली. औरंगाबादेत आल्यानंतर सासू-सासऱ्यांनी घरी येऊ दिले नसल्यामुळे माहेरी गेली. सासरी विनंती करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तिने अखेर जिन्सी पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याच्या विरोधात तक्रार नोंदविली.

तीनवेळा गळा दाबण्याचा प्रयत्नजर्मनीत असताना वैभवने पत्नीचा तीनवेळा झोपेत असताना गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचे तिच्या माहेरच्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्याशिवाय उच्चशिक्षित मुलीला सतत टोमणे, शिवीगाळ करण्यात येत असल्यामुळे तिचे मानसिक खच्चीकरणही झाल्याचे त्यांनी सांगितले. सासू, सासऱ्यांनी तिचे दागिनेही घेतले. अधिक तपास उपनिरीक्षक अनंता तांगडे करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी