शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:06 IST

गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी सुरक्षेच्या कारणावरून मंगळवारी (दि.१६) सकाळी ‘मास बंक ’ आंदोलन पुकारले. दोनशेवर डॉक्टर आंदोलनात सहभागी झाल्याने घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत झाली. परिणामी, रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देनिवासी डॉक्टरांचा मास बंक : वरिष्ठ डॉक्टरांच्या खाद्यांवर सेवेचा भार, परिचारिकांनीही केले प्रयत्न

औरंगाबाद : गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी सुरक्षेच्या कारणावरून मंगळवारी (दि.१६) सकाळी ‘मास बंक ’ आंदोलन पुकारले. दोनशेवर डॉक्टरआंदोलनात सहभागी झाल्याने घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत झाली. परिणामी, रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.घाटीतील निवासी डॉक्टरांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन मंगळवारी सकाळपासून कामावर गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. घाटीत बाह्यरुग्ण विभागात दररोज सकाळी दोन हजारांवर रुग्ण येतात, तर एक हजारांवर रुग्ण वॉर्डात दाखल असतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी ओपीडीत रुग्णांची गर्दी होती. या रुग्णांना डॉक्टरांच्या आंदोलनाचा फटका बसला. निवासी डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णसेवेसाठी घाटी प्रशासनाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, हाऊस आॅफिसर, इंटर्न आणि वरिष्ठ डॉक्टरांना पाचारण केले. या सर्वांनी आणि परिचारिकांनी रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी परिश्रम घेतले; परंतु डॉक्टरांची संख्या अपुरी पडल्याने रुग्णांना उपचारासाठी तासन्तास ताटकळावे लागले.बाह्यरुग्ण विभाग, सर्जिकल इमारतीतील विविध वॉर्डांत निवासी डॉक्टरांअभावी रुग्णसेवेची तारांबळ उडाली. केवळ अत्यावश्यक रुग्णसेवेला प्राधान्य देण्यात आले. आंदोलनाचे कारण पुढे करून उपचारास टाळाटाळ केल्याचा आरोपही काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केला.सुरक्षाव्यवस्थेची पोलखोलबाह्यरुग्ण विभाग, सर्जिकल इमारतीत जाऊन सर्व निवासी डॉक्टरांनी त्यांच्या सहकाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येण्याचे आवाहन केले. त्यानुसार महाविद्यालय परिसरात सर्व निवासी डॉक्टर एकत्र जमले. डॉक्टरांनी घाटीतील सुरक्षाव्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरक्षाव्यवस्थेचा निवासी डॉक्टरांनी सोमवारी रात्री प्रत्यक्ष आढावा घेतला. तेव्हा गांजा ओढणाºया एका व्यक्तीस पकडून सुरक्षारक्षकांच्या स्वाधीन केले. ही सुरक्षाव्यवस्थेची पोलखोल असल्याचे डॉक्टरांनी म्हटले.तिसºया घटनेत बाचाबाचीघाटीत २४ तासांत दोन घटनांत निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या दोन घटनांबरोबर तिसरी घटनाही घडली असून, नातेवाईकांनी आयसीयूतील डॉक्टरांबरोबर बाचाबाची केल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले.सुरक्षेचे आश्वासन कागदावरच,बाऊन्सर नेमण्याची तयारीधक्काबुक्कीच्या घटनेनंतर एप्रिलमध्ये निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हा घाटीत बाऊन्सर नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांतील घटनेनंतर पुन्हा हीच मागणी समोर आली आहे. त्यामुळे अखेर घाटीने बाऊन्सर नेमण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी ही सेवा देणाºयांशी चर्चा करण्यात आली. सुनियोजित तपास पद्धत, निश्चित वेळेतच नातेवाईकांना रुग्णाला भेटण्याची मुभा, वाहनांवर नियंत्रण, मकाईगेट परिसरातील संरक्षक भिंत बंद करणे, अशा अनेक मागण्यांची पूर्तता घाटी प्रशासनाकडून सहा महिन्यांनंतरही झाली नाही. त्या कागदावरच राहिल्याने डॉक्टरांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली.५० टक्के डॉक्टर संपावरघाटीतील केवळ ५० टक्के निवासी डॉक्टर संपावर गेले. शिवाय वरिष्ठ डॉक्टरांनी सेवा दिली. आपत्कालीन सेवा सुरळीत ठेवण्यात आली असून, नियमित रुग्णांचीही ५० टक्क्यांवर तपासणी आणि उपचार झालेले आहेत. निवासी डॉक्टरांच्या मागणीनुसार बाऊन्सर नियुक्त करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू केली आहे.-डॉ. भारत सोनवणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरagitationआंदोलन