शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:06 IST

गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी सुरक्षेच्या कारणावरून मंगळवारी (दि.१६) सकाळी ‘मास बंक ’ आंदोलन पुकारले. दोनशेवर डॉक्टर आंदोलनात सहभागी झाल्याने घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत झाली. परिणामी, रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देनिवासी डॉक्टरांचा मास बंक : वरिष्ठ डॉक्टरांच्या खाद्यांवर सेवेचा भार, परिचारिकांनीही केले प्रयत्न

औरंगाबाद : गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी सुरक्षेच्या कारणावरून मंगळवारी (दि.१६) सकाळी ‘मास बंक ’ आंदोलन पुकारले. दोनशेवर डॉक्टरआंदोलनात सहभागी झाल्याने घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत झाली. परिणामी, रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.घाटीतील निवासी डॉक्टरांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन मंगळवारी सकाळपासून कामावर गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. घाटीत बाह्यरुग्ण विभागात दररोज सकाळी दोन हजारांवर रुग्ण येतात, तर एक हजारांवर रुग्ण वॉर्डात दाखल असतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी ओपीडीत रुग्णांची गर्दी होती. या रुग्णांना डॉक्टरांच्या आंदोलनाचा फटका बसला. निवासी डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णसेवेसाठी घाटी प्रशासनाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, हाऊस आॅफिसर, इंटर्न आणि वरिष्ठ डॉक्टरांना पाचारण केले. या सर्वांनी आणि परिचारिकांनी रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी परिश्रम घेतले; परंतु डॉक्टरांची संख्या अपुरी पडल्याने रुग्णांना उपचारासाठी तासन्तास ताटकळावे लागले.बाह्यरुग्ण विभाग, सर्जिकल इमारतीतील विविध वॉर्डांत निवासी डॉक्टरांअभावी रुग्णसेवेची तारांबळ उडाली. केवळ अत्यावश्यक रुग्णसेवेला प्राधान्य देण्यात आले. आंदोलनाचे कारण पुढे करून उपचारास टाळाटाळ केल्याचा आरोपही काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केला.सुरक्षाव्यवस्थेची पोलखोलबाह्यरुग्ण विभाग, सर्जिकल इमारतीत जाऊन सर्व निवासी डॉक्टरांनी त्यांच्या सहकाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येण्याचे आवाहन केले. त्यानुसार महाविद्यालय परिसरात सर्व निवासी डॉक्टर एकत्र जमले. डॉक्टरांनी घाटीतील सुरक्षाव्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरक्षाव्यवस्थेचा निवासी डॉक्टरांनी सोमवारी रात्री प्रत्यक्ष आढावा घेतला. तेव्हा गांजा ओढणाºया एका व्यक्तीस पकडून सुरक्षारक्षकांच्या स्वाधीन केले. ही सुरक्षाव्यवस्थेची पोलखोल असल्याचे डॉक्टरांनी म्हटले.तिसºया घटनेत बाचाबाचीघाटीत २४ तासांत दोन घटनांत निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या दोन घटनांबरोबर तिसरी घटनाही घडली असून, नातेवाईकांनी आयसीयूतील डॉक्टरांबरोबर बाचाबाची केल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले.सुरक्षेचे आश्वासन कागदावरच,बाऊन्सर नेमण्याची तयारीधक्काबुक्कीच्या घटनेनंतर एप्रिलमध्ये निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हा घाटीत बाऊन्सर नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांतील घटनेनंतर पुन्हा हीच मागणी समोर आली आहे. त्यामुळे अखेर घाटीने बाऊन्सर नेमण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी ही सेवा देणाºयांशी चर्चा करण्यात आली. सुनियोजित तपास पद्धत, निश्चित वेळेतच नातेवाईकांना रुग्णाला भेटण्याची मुभा, वाहनांवर नियंत्रण, मकाईगेट परिसरातील संरक्षक भिंत बंद करणे, अशा अनेक मागण्यांची पूर्तता घाटी प्रशासनाकडून सहा महिन्यांनंतरही झाली नाही. त्या कागदावरच राहिल्याने डॉक्टरांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली.५० टक्के डॉक्टर संपावरघाटीतील केवळ ५० टक्के निवासी डॉक्टर संपावर गेले. शिवाय वरिष्ठ डॉक्टरांनी सेवा दिली. आपत्कालीन सेवा सुरळीत ठेवण्यात आली असून, नियमित रुग्णांचीही ५० टक्क्यांवर तपासणी आणि उपचार झालेले आहेत. निवासी डॉक्टरांच्या मागणीनुसार बाऊन्सर नियुक्त करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू केली आहे.-डॉ. भारत सोनवणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरagitationआंदोलन