शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपदाची आशा आता धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 23:44 IST

माजलगाव : युतीचे सरकार येऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला, तरीही केंद्रात मंत्रीपद व सहकाऱ्यांना सत्तेत वाटा न मिळोलला नाही.

माजलगाव : युतीचे सरकार येऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला, तरीही केंद्रात मंत्रीपद व सहकाऱ्यांना सत्तेत वाटा न मिळोलला नाही. पुढील तीन वर्षातही मंत्रीपद मिळण्याच्या आशा धुसर असल्याची खंत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी व्यक्त केली. कन्याकुमारी ते महु अशा सबंध देशात निघालेल्या भारत भीमयात्रेचे येथे मंगळवारी आगमन झाले. यावेळी मोंढा मैदान आयोजित सभेत ते बोलत होते. युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, सीमा आठवले, धम्मानंद मुंडे, बाबुराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. आठवले म्हणाले की, समाज एकसंघ राहण्यासाठी ‘जाती तोडो, समाज जोडो’ ही संकल्पना घेवून भारत भीमयात्रा काढण्यात आली आहे. विविध जाती धर्मातील समपातळीवर अंतरजातीय विवाह जोडून जातीभेद नष्ट करण्याची आवश्यकता आहे. जातीवाद संपणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे म्हणाले, समतेसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज परिवर्तनाची चळवळ येत्या काळात गतिमान करण्याचा मानस आहे.स्वागताध्यक्ष अविनाश जावळे, सीमा आठवले, शीला गांगुर्डे, बाबूराव कदम, धम्मानंद मुंडे, दिलीप जोशी, मिलिंद शेळके यांचेही भाषण झाले. भारत भीम यात्रेचे स्थानिक रिपाइं कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात अतषबाजी करीत स्वागत केले. सुंदरराव सोळंके महाविद्यालयापासून रॅली काढण्यात आली. नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)