शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कृषी कायद्यास स्थगिती देणाऱ्या अध्यादेशाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 1:08 PM

केंद्र शासनाने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याच्या  विरोधात  भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत  शासनाने कृषी  विधेयकाच्या स्थगितीसाठी  काढलेल्या  अध्यादेशाची होळी केली. 

औरंगाबाद : केंद्र शासनाने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याच्या  विरोधात  भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत  शासनाने कृषी  विधेयकाच्या स्थगितीसाठी काढलेल्या अध्यादेशाची होळी केली. 

कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून ते राज्यात लागू करण्याची मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.  यावेळी बोलताना  आ. हरिभाऊ बागडे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या ६ वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. डॉ. स्वामीनाथन  आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.  युपीए सरकारने  स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखविली नाही. कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे  जीवनमान उंचावणार  आहे. मात्र राजकीय हेतूने त्यास राज्य शासनाने विरोध केला आहे, असा आरोप बागडे यांनी केला. 

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, सरचिटणीस लक्ष्मण औटे, अशोक पवार, सूरज लोळगे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची  मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :agricultureशेतीbillबिलBJPभाजपा