शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उंच गतिरोधक, अरुंद रस्ते अन् सुसाट वाहने; बेफाम वेगाने घेतला दोन युवकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:02 IST

एक दुचाकी पोलिसांच्या गाडीखाली, दुसऱ्याला कारने उडवले

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे अरुंद रस्त्यावर सुसाट कारच्या धडकेत आई-वडिलांनी एकुलता एक मुलगा गमावला तर दुसऱ्या घटनेत तरुणाचा गतिरोधकावरून दुचाकी उडून थेट पोलिसांच्या वाहनाच्या चाकाखाली सापडून करुण अंत झाला. सोमवारी दोन कुटुंबांनी घरातले तरुण गमावल्याच्या या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. ओम अजय महाजन (२१, रा. नारेगाव) व विष्णू काशीनाथ खर्जुले (२६, रा. करमाड) अशी मृत युवकांची नावे आहेत.

ओम आई-वडिलांसह नारेगावमध्ये राहत होता. त्याचे वडील खासगी नोकरी करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही ओमने अभ्यास करून अभियांत्रिकीला प्रवेश मिळवला होता. तो तृतीय वर्षात होता. रविवारी रात्री ९ वाजता तो क्लासवरून दुचाकीने घरी परतत असताना नारेगावच्या जय भवानी चौकात त्याला सुसाट कारने (एमएच २० -जीआर -७९०१) उडवून पोबारा केला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गतिरोधकावरून उडाला, पोलिस वाहनाने चिरडलेसोमवारी रात्री ८ वाजता विमानतळ परिसरात विष्णू खर्जुले (२६) या तरुणाचा वाहनाखाली मृत्यू झाला. विष्णू करमाडच्या दिशेने निघाला होता. याच वेळी एमआयडीसी सिडको पोलिस चिकलठाण्यातील दोन शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात पंचनामा करण्यासाठी शासकीय वाहनातून (एमएच २० -एचबी-९३२१) निघाले हाेते. विमानतळाच्या विरुद्ध दिशेच्या न्यू हायस्कूलसमोरील उंच गतिरोधकावरून विष्णूचा दुचाकीवरील तोल सुटून तो कोसळला. त्याच वेळी मागून जाणाऱ्या पोलिसांच्या सुसाट वाहनाखाली चिरडला गेला.

महिनाभरात पती, मुलाला गमावलेदोन विवाहित बहिणी असलेला विष्णू लहान भाऊ व आईसह करमाडला राहत होता. महिनाभरापूर्वीच आजारपणामुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. महिनाभरात पतीसह मोठा मुलगाही गमवावा लागल्याने त्याच्या आईचा आक्रोश प्रत्येकाचे मन हेलावून गेला.

पोलिसांची याच घटनेत इतकी तत्परता का ?-पोलिसांच्या दाव्यानुसार, गतिरोधकावरून उडून दुसऱ्या दुचाकीच्या हँडलचा धक्का लागून विष्णू पोलिसांच्या वाहनाला धडकला. प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार, गतिराेधकावरून उडाल्यानंतर विष्णू रस्त्यावर कोसळला. त्यानंतर पोलिसांचे वाहन त्याच्या अंगावरून गेले.-सामान्यत: अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिस कुटुंबाची फिर्याद घेतात. सहसा शवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल होतो. मात्र, विष्णूच्या मृत्यू प्रकरणात ८ वाजेच्या अपघातात शवविच्छेदनाआधीच पोलिसांनी स्वत:च फिर्यादी होत १:४३ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करून टाकला. त्यामुळे नेमके दोषी कोण, हा प्रश्न जाणीवपूर्वक अनुत्तरित ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यू