शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

उंच गतिरोधक, अरुंद रस्ते अन् सुसाट वाहने; बेफाम वेगाने घेतला दोन युवकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:02 IST

एक दुचाकी पोलिसांच्या गाडीखाली, दुसऱ्याला कारने उडवले

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे अरुंद रस्त्यावर सुसाट कारच्या धडकेत आई-वडिलांनी एकुलता एक मुलगा गमावला तर दुसऱ्या घटनेत तरुणाचा गतिरोधकावरून दुचाकी उडून थेट पोलिसांच्या वाहनाच्या चाकाखाली सापडून करुण अंत झाला. सोमवारी दोन कुटुंबांनी घरातले तरुण गमावल्याच्या या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. ओम अजय महाजन (२१, रा. नारेगाव) व विष्णू काशीनाथ खर्जुले (२६, रा. करमाड) अशी मृत युवकांची नावे आहेत.

ओम आई-वडिलांसह नारेगावमध्ये राहत होता. त्याचे वडील खासगी नोकरी करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही ओमने अभ्यास करून अभियांत्रिकीला प्रवेश मिळवला होता. तो तृतीय वर्षात होता. रविवारी रात्री ९ वाजता तो क्लासवरून दुचाकीने घरी परतत असताना नारेगावच्या जय भवानी चौकात त्याला सुसाट कारने (एमएच २० -जीआर -७९०१) उडवून पोबारा केला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गतिरोधकावरून उडाला, पोलिस वाहनाने चिरडलेसोमवारी रात्री ८ वाजता विमानतळ परिसरात विष्णू खर्जुले (२६) या तरुणाचा वाहनाखाली मृत्यू झाला. विष्णू करमाडच्या दिशेने निघाला होता. याच वेळी एमआयडीसी सिडको पोलिस चिकलठाण्यातील दोन शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात पंचनामा करण्यासाठी शासकीय वाहनातून (एमएच २० -एचबी-९३२१) निघाले हाेते. विमानतळाच्या विरुद्ध दिशेच्या न्यू हायस्कूलसमोरील उंच गतिरोधकावरून विष्णूचा दुचाकीवरील तोल सुटून तो कोसळला. त्याच वेळी मागून जाणाऱ्या पोलिसांच्या सुसाट वाहनाखाली चिरडला गेला.

महिनाभरात पती, मुलाला गमावलेदोन विवाहित बहिणी असलेला विष्णू लहान भाऊ व आईसह करमाडला राहत होता. महिनाभरापूर्वीच आजारपणामुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. महिनाभरात पतीसह मोठा मुलगाही गमवावा लागल्याने त्याच्या आईचा आक्रोश प्रत्येकाचे मन हेलावून गेला.

पोलिसांची याच घटनेत इतकी तत्परता का ?-पोलिसांच्या दाव्यानुसार, गतिरोधकावरून उडून दुसऱ्या दुचाकीच्या हँडलचा धक्का लागून विष्णू पोलिसांच्या वाहनाला धडकला. प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार, गतिराेधकावरून उडाल्यानंतर विष्णू रस्त्यावर कोसळला. त्यानंतर पोलिसांचे वाहन त्याच्या अंगावरून गेले.-सामान्यत: अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिस कुटुंबाची फिर्याद घेतात. सहसा शवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल होतो. मात्र, विष्णूच्या मृत्यू प्रकरणात ८ वाजेच्या अपघातात शवविच्छेदनाआधीच पोलिसांनी स्वत:च फिर्यादी होत १:४३ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करून टाकला. त्यामुळे नेमके दोषी कोण, हा प्रश्न जाणीवपूर्वक अनुत्तरित ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यू