शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याच्या विवाहितेचा गळा आवळून खून

By admin | Updated: September 21, 2014 00:24 IST

जालना : पाच वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेला सासरच्या मंडळींने माहेराहून पैसे आण म्हणून त्रास दिला. आज २० सप्टेंबर रोजी तिचा साडीने गळा आवळून नवरा एकनाथ

जालना : पाच वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेला सासरच्या मंडळींने माहेराहून पैसे आण म्हणून त्रास दिला. आज २० सप्टेंबर रोजी तिचा साडीने गळा आवळून नवरा एकनाथ गणपत हरकळ याने खून केला. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जालना येथील कसबा भागात राहणारे भगवान आसाराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली मुलगी कविता हिचे लग्न पाच वर्षापूर्वी एकनाथ हरकळ सोबत लावण्यात आले होते. या दरम्यान, मुलबाळ झाले नसल्याने सासरच्या मंडळीने त्रास देऊन मारहान करण्यास सुरूवात केली. खून केल्यानंतर कविताचे प्रेत सरकारी दवाखान्यात आणले होते. सिंदखेड राजा येथे तुळशीदास चौधरी यांनी दूरध्वनीवरून जनार्धन जाधव या मयताच्या चुलत्यास कळविले. त्यानंतर सर्व नातेवाईक सरकारी दवाखाना येथे गेले.त्यावेळी गळ्यावर आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ७० हजार रूपयांची मागणी एकनाथ हरकळ याने केली होती. यासाठी कविताला माहेरी तब्बल दीड वर्ष सोडून दिले होते. त्यामुळे आर्थिक स्थिती बिकट असतांनाही २५ हजार रूपये दिले होते. मात्र त्यानंतरही कविताने सासू लक्ष्मीबाई गणपत हरकळ, सासरा गणपत हरकळ सारखे त्रास देत होते. सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात आरोपी एकनाथ हरकळ, लक्ष्मीबाई हरकळ, गणपत हरकळ, दिपक हरकळ, शारदा घोडके यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एकनाथ हरकळ ला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)