शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
4
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
5
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
6
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
7
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
8
मुंबईकरांसाठी खुशखबर! एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
9
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
10
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
11
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
12
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
13
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
14
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
15
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
16
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
17
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
18
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
19
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."
20
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड

अतिवृष्टीमुळे निराशा वाढली; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:18 IST

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली असून यातून तिघांनी टोकाचे निर्णय घेतले.

दौलताबाद/बनकिन्होळा : जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली असून, हताश तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा व गंगापूर तालुक्यातील जांभळा येथे सोमवारी तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथे मंगळवारी उघडकीस आली. रामेश्वर पुंडलिक फरकाडे (वय ३४), जगन्नाथ रखमाजी आढाव (वय ६०) व अरुण अशोक मंजुळ (वय ३३ वर्षे) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत.

माळीवाडा शिवारात गट क्रमांक ६७ मध्ये जगन्नाथ आढाव यांची १ एक्कर ३७ गुंठे शेती आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले. या पीक लागवडीसाठी केलेला खर्च आणि घेतलेले कर्ज कसे फेडावे, याच चिंतेत ते मानसिक तणावाखाली होते. याच तणावातून त्यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास माळीवाडा शिवारातील गट क्रमांक ५५ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

सव्वा एकरमधील मका, कापूस हातचे गेल्याने जीवन संपविलेबनकिन्होळा : सव्वा एकर शेतात लागवड केलेला कापूस आणि मका ही पिके अतिवृष्टीने हातची गेल्याने निराश झालेल्या सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील एका ३४ वर्षीय शेतकरी रामेश्वर पुंडलिक फरकाडे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. मृत शेतकरी रामेश्वर फरकाडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रामेश्वर यांचे एक ते दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते. या घटनेची नोंद वडोद बाजार पोलिस ठाण्यात झाली आहे.

जाभांळा येथे मध्यरात्री उठून घेतला गळफास

गंगापूर तालुक्यातील जाभांळा येथील शेतकरी अरुण अशोक मंजुळ यांच्या आईच्या नावाने खडकनारळा व वसुसायगाव शिवारात गट नं. १११ व १३१ मध्ये पाच एकर शेती आहे. त्यात त्यांनी यंदा कापूस व तूर लावली होती. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्ज काढून, उसणवारी करून खरिपात लागवड केली आणि आता हातचे पिकही गेले, असे म्हणून अरूण मंजूळ हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होते. यातूनच त्यांनी सोमवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी ॲंगलला साडीने गळफास घेतला. साडीचा पदर तुटल्याने अरूण मंजुळ हे खाली पडल्याने आवाज ऐकूण त्यांच्या आईने खोलीत डोकावून पाहिले असता त्यांना अरूण हे पडलेले आणि लोखंडी ॲगलला साडी दिसली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नातेवाईक जमा झाले. त्यांनी अरूण यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. अरुण मंजुळ यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Loss Leads to Farmer Suicides in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : Distressed by crop losses due to heavy rains, three farmers in Chhatrapati Sambhajinagar district ended their lives. The farmers, burdened by debt and crop failure, took the extreme step in separate incidents across Sillod and Gangapur talukas.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर