शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

अतिवृष्टीचा फटका! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी लागेल २३४ कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:59 IST

अतिवृष्टीने एकूण १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळपिकांना फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून २ लाख ५७ हजार ३०५ बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २३४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केला असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील प्राप्त अहवाल एकत्रित करुन नुकसानभरपाईसाठी निधी मागणी अहवाल शासनाकडे सादर होईल. अतिवृष्टीमुळे १ लाख ४६ हजार ८३८ हेक्टरवरील जिरायती क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले. यासह २२ हेक्टरवरील बागायत तर ९ हजार ५६८ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला.

एकूण १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. जिरायत क्षेत्रातील नुकसानभरपाईसाठी १९९ कोटी ७० लाख रुपये, बागायत क्षेत्रासाठी ५ लाख ९४ हजार रुपये तर फळपीक क्षेत्रासाठी ३४ कोटी ४४ लाख ७६ हजार ४४० रुपयांचा निधीची गरज असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुका             – बाधित शेतकरी - बाधित क्षेत्र - अपेक्षित निधीछत्रपती संभाजीनगर – ५०४९             - ४२९६.७९ - १५ कोटीपैठण             – ९४१५५             - ५०७९०             - ७१ कोटीफुलंब्री             – १०५                         - ६९.०७             - ९३ लाखगंगापूर             – ३०७६१             - २२४८९             - ३१ कोटीखुलताबाद             – १२५५१             - ८३४६             - ११ कोटीसिल्लोड             – ७९१२०             - ५०१४७             - ६८ कोटीकन्नड                         – २५७६             - ८०२             - ११कोटी            सोयगाव             – ३२९८८             - १९४८९.१७ - २६ कोटीएकूण                         - २५७३०५             - १५६४२९.०३ - २३४ कोटी

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी