शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

मराठवाड्यातील १६४ मंडळांत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 07:14 IST

मुसळधार पावसामुळे तीन जिल्ह्यांतील पिके धोक्यात

औरंगाबाद : मराठवाड्यातील १६४ मंडळांमध्ये १०० मि.मी.,पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याचे संकट उभे राहिले आहे. तीन जिल्ह्यांतील पिके अतिरिक्त पावसामुळे धोक्यात आली असून, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. १६ आॅगस्टपासून सुरू झालेल्या पावसामुळे हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील खरीप हंगामातील पिकांचा नाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हिंगोलीतील ३० पैकी १९ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या मंडळांतर्गत येणाऱ्या खरीप पिकांची शेती पाण्याखाली आली आहे. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी १३ मंडळांत पावसाने हाहाकार उडविला आहे, तर नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ५० मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला विभागीय प्रशासनाने आदेश दिले आहेत.औरंगाबादमधील ६५पैैकी १६ मंडळांत जालन्यातील ४९ पैकी १९ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत पावसाची अपेक्षा असून खरीप हंगामाच्या पिकांना त्याची गरज आहे. बीडमधील ६३ पैकी १७ मंडळांत अतिवृष्टी नोंदविली गेली आहे, तर लातूरमधील ५३ पैकी २२ आणि उस्मानाबादमधील ४२ पैकी ८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे ५ जिल्ह्यांत खरीप हंगामाला पावसाची गरज आहे. आजवर ५९ टक्के पावसाची नोंद मराठवाड्यात झाली आहे.खरीप हंगामात ९ हजार कोटींची गुंतवणूकमराठवाड्याचे खरीप पिकांखालील क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हेक्टरनिहाय पीकपेरणीच्या खर्च सूत्रानुसार अंदाज बांधला, तर खरीप हंगामात नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे, खतांच्या खरेदीसाठी करण्यात आलेली अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद