उष्णतेची लाट कायम
By Admin | Updated: May 29, 2014 01:12 IST2014-05-29T00:57:18+5:302014-05-29T01:12:12+5:30
औरंगाबाद : उन्हाचा पारा बुधवारी चांगलाच चढला.

उष्णतेची लाट कायम
औरंगाबाद : उन्हाचा पारा बुधवारी चांगलाच चढला. अंगाची लाहीलाही करणार्या उन्हामुळे दुपारी औरंगाबादेत शहरात अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पारा ४२.४२ च्या वर पोहोचला होता. वेधशाळेच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस उष्णतेची ही लाट कायम राहणार असून, पारा आणखी चढण्याची शक्यता आहे. उन्हाच्या पार्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिक घराबाहेर पडायला तयार नाहीत. शाळांच्या परीक्षाही संपल्या, त्यामुळे दुपारच्या वेळेला शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. दुपारी लोक घराबाहेर पडायला तयार नसल्यामुळे बाजारपेठेतील दुकाने काही वेळ बंद ठेवण्यात येत आहेत. रखरखत्या उन्हाच्या कडाक्यापासून बचावासाठी शहरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कूलरची मागणी वाढली. नोकरदारांना मात्र नोकरीसाठी कडक उन्हातही काम करावेच लागते. उन्हाच्या दाहकतेपासून थोडी मुक्ती मिळविण्यासाठी शहरात उसाचा रस, आइस्क्रीम, बर्फाचे गोळे, कोल्ड्रिंक्स, ज्यूसची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. मृगनक्षत्रापर्यंत औरंगाबादकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.