शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागच आजारी

By admin | Updated: July 23, 2014 00:22 IST

सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील २ लाख ६० हजार नागरिकांच्या आरोग्याचे ओझे केवळ १० डॉक्टरांच्या डोक्यावर असल्यामुळे आरोग्य विभाग आजारी झाला आहे.

सुनील चौरे, हदगावतालुक्यातील २ लाख ६० हजार नागरिकांच्या आरोग्याचे ओझे केवळ १० डॉक्टरांच्या डोक्यावर असल्यामुळे आरोग्य विभाग आजारी झाला आहे. या विभागालाच उपचाराची गरज असल्याचे चित्र आहे़ ३१ उपकेंद्रातील बाळंतकक्ष नावालाच असून गोरगरीबांना किरकोळ आजारांसाठी खाजगी डॉक्टराची मदत घ्यावी लागत आहे़तालुक्यात १४५ गावांतील २ लाख ६० हजार लोकांसाठी सहा आरोग्य केंद्र व एक उपजिल्हा रुग्णालय आहे़ या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रावर २ लाख २१ हजार ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यासाठी ४ डॉक्टर आहेत़ तामसा येथील डॉक्टर निवृत्त झाले असून बरडशेवाळा येथील डॉक्टरचे पद रिक्त आहे़ हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ४० हजार लोकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी ६ डॉक्टर असून रेग्यूलर ५ डॉक्टर आहेत़ त्यापैकी दोन डॉक्टरांची बदली झाली आहे़या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३१ उपकेंद्र आहेत़ या उपकेंद्रावर निदान दोन कर्मचारी नियुक्त असणे आवश्यक आहे़ यामध्ये पुरूष कर्मचाऱ्यांची १९ पदे भरलेली आहेत़ तर १२ पदे रिक्त आहेत़ स्त्री कर्मचाऱ्यांची कंत्राटी ३१ पदे भरलेली आहेत़ एकूण आरोग्य कर्मचारी १४५ गावांसाठी ६२ आहेत़ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर एक एमबीबीएस व एक बीएएमएस अशी दोन डॉक्टरांची पदे असतात़ परंतु बरडशेवाळा, आष्टी, तामसा या ठिकाणी ही पदे रिक्त आहेत़बरडशेवाळा, निमगाव, कोहळी, तामसा, आष्टी, वायफना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ ही केंदे्र व्यवस्थित चालू राहिली तरी ग्रामस्थांना चांगली सेवा मिळू शकते़ परंतु येथे निम्मे पदे रिक्त आहेत़ असलेले डॉक्टर, कर्मचारी स्थानिक केंद्रात राहत नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजास्तव खाजगी डॉक्टरकडे जावून आरोग्य बिघडून घ्यावे लागते़ आर्थिक भूर्दंड वेगळाच़ सहा प्राथमिक केंद्रांतर्गत ३१ उपकेंद्र नावालाच आहेत़ याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही़ पिंपरखेड, कवाना, अंबाळा, गोर्लेगाव, मनाठा, चाभरा, चिंचगव्हाण, निमगाव, आष्टी, लिंगापूर, हरडप, बनचिंचोली, लोहा, घोगरी, पाथरड, चिकाळा, शिरड, निवघा, तळणी, येळंब, भाटेगाव, उमरी, नेवरी, उंचेगाव (बु़), कोहळी इ़ केंद्रे आहेत़ परंतु सर्वत्र परिस्थिती सारखीच आहे़ उपकेंद्रावर बाळंतकक्ष २४ तास सुरू असायला पाहिजे़ ते केवळ ३ ते ४ तास आठवड्यातून ३ ते ४ दिवस सुरू असते़ अडगळीचे केंद्र कायमच बंद असतात़ एवढ्यावरही काम व्यवस्थित व्हावीत ही रुग्णाची अपेक्षा, तीही अपूर्णच़ कारण स्थानिक एकही कर्मचारी राहत नाही़ जिल्ह्यावरून ये-जा करतात़ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा किंवा वर्तमानपत्रात बातमी आली की दोन-चार दिवस हे डॉक्टर नियमित दिसतात़ पुन्हा चंद्राप्रमाणे गायब होतात़ याउलट खाजगी डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े़ एखाद्या अवघड आजाराचा उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर घाबरेल, परंतु ही डॉक्टर मंडळी बेधडक महागडी औषधी देऊन रुग्णांचे बेहाल करतात़ नैसर्गिक आपत्ती, पावसाचा बेजबाबदारपणा या संकटातून तगावलेल्या ग्रामस्थांना या आरोग्य विभागाचाही दणका बसत आहे़बाळंतकक्षाची सुविधा उपलब्ध नाही मृत्यूदर घटला हे खरे असले तरी ग्रामीण भागात नवशिशु जन्मताच मृत पावण्याचे प्रमाण गंभीर आहे़ बाळंतकक्षाची व्यवस्था नसल्याने उपचाराअभावी महिन्याकाठी १-२ बालमृत्यू होतच असतो़ त्याची दप्तरी नोंदही नसते़ हे सर्व चुपचाप सुरू असते़ अनेक ठिकाणी पती-पत्नी, वडील-मुलगा किंवा नातेवाईक डॉक्टर आहेत़ त्यापैकी एकच दवाखान्यात उपस्थित असतो़ दुसरा फक्त पगार घेतो़ हदगाव शहरात शालेय तपासणीसाठी ३ डॉक्टर, आयुष डॉक्टर ३ यामध्ये आयुर्वेदिक, युनानी, अ‍ॅलोपॅथीक तर नियमित डॉक्टरांची संख्या ५ आहे़ यामध्ये दोन स्पेशालिस्टची बदली होवून त्याऐवजी दोन एमबीबीएस डॉक्टर देण्यात आले़ डॉक्टरांची संख्या वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमीच होत आहे़ कर्मचाऱ्यांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांऐवजी लागेबांधे असलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे वरिष्ठांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागते़