शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

खून नव्हे बेरोजगारीच्या निराशेतून त्याने पेटवून घेतले असावे; चौघांची खंडपीठात निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 12:35 IST

शिक्षा ठोठावणारा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द : सबळ पुराव्याअभावी खुनाच्या आरोपातून चौघांची खंडपीठात निर्दोष मुक्तता

औरंगाबाद : अजय गवळेच्या (रा. संभाजी कॉलनी, औरंगाबाद ) खुनामागील उद्देश निदर्शनास आला नाही. याउलट बेरोजगारीच्या निराशेतून अजयने पेटवून घेतले असावे, असे पुराव्यांवरून दिसते, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट आणि न्या. आर. एम. जोशी यांनी चौघांची निर्दोष मुक्तता केली. तसेच खुनाच्या आरोपाखाली वरील चौघांना शिक्षा ठोठावणारा सत्र न्यायालयाचा आदेशही रद्द केला.

मुलीला त्रास देत असल्याच्या कारणावरून अजयला त्याची सासू, दोन मेहुणे, साडू अशा सासरच्या ४ जणांनी ३१ मे २०११ रोजी घरात घुसून मारहाण केली. तसेच रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले. उपचारादरम्यान अजयचा मृत्यू झाल्यामुळे वरील चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सत्र न्यायालयाने मृताची पत्नी वगळता या चौघांना २५ जुलै २०१६ रोजी शिक्षा ठोठावली होती. त्या आदेशाविरुद्ध चौघांनी ॲड. एन. एस. कद्राळे यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी अपील दाखल केले होते. अपीलार्थींचा (मूळ आरोपी) अजयच्या खुनामागील उद्देश निदर्शनास आला नाही. असे निरीक्षण नोंदवित खंडपीठाने निकालपत्रात अभियोग पक्षाच्या पुराव्यातील काही त्रुटींचा उल्लेख केला आहे.

विशेषत: घटनेच्या १२ तासांनंतर आणि घाटी दवाखान्यात दाखल केल्यानंतर १० तासांनी अजयचा जबाब नोंदविण्यात आला. जबाब देण्याच्या परिस्थितीत असताना पोलिस हेड कॉन्स्टेबल गवई यांनी अजयचा जबाब रात्री १२ वाजता का नोंदविला नाही. अजयचे वडील त्याच्या सोबतच होते. त्यांनी अजयला सासरच्या लोकांविरुद्ध जबाब देण्यासाठी ‘पढवले’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी अजयचा मुत्यूपूर्व जबाब नोंदविला तेव्हा व त्यानंतर तो शुद्धीवर आणि जबाब देण्याच्या स्थितीत होता काय याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुष्टी दिल्याचा पुरावा नाही. या बाबींचा व इतर पुराव्यांचा विचार करून खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारी