शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 14:57 IST

लातुरात सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत कमी वाढ

औरंगाबाद : ‘टँकरवाडा’ ही ओळख मिटवत सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याच्या भूजल पातळीत २.७९ मीटरने वाढ झाली ( Groundwater level in Marathwada ) आहे. यंदा पावसाची मराठवाड्यावर कृपादृष्टी राहिली. यामुळे दुष्काळाची सावट मिटले आहे.

मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक भूजल पातळी ४.३७ मीटरने वाढली आहे. सर्वांत कमी १.१६ मीटरची वाढ हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. भूजल पातळी ३.९४ मीटरने वाढून परभणी दुसऱ्या स्थानावर आहे, तर २.११ मीटरने भूजल पातळी वाढून औरंगाबाद ६ व्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये सरासरी पाणीपातळी २.०३ मीटर एवढी होती. मराठवाड्यात १११२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी या कालावधीत सरासरी ६७९.५ मिमी पाऊस होतो. परतीच्या पावसाने काही जिल्ह्यांत ढगफुटीसारखा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता रब्बी पिकांना या भूजल पातळी वाढल्याचा मोठा फायदा होणार आहे. हवामान पोषक राहिले तर गहू, ज्वारी अन्य पिके जोमात येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच टँकरवर अवलंबून राहणाऱ्या गावांची संख्या तुरळक राहील.

सोनपेठ तालुक्यात विक्रमी वाढभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील ८७५ निरीक्षण विहिरीच्या पाणीपातळीची तपासणी केली. ७६ तालुक्यांतील या निरीक्षण विहिरी आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे ०.२७ मीटरने भूजल पातळी वाढली. ही मराठवाड्यातील सर्वांत कमी वाढ आहे, तर सर्वाधिक परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील भूजल पातळीत ७.३५ मीटर एवढी विक्रमी वाढ झाली आहे. भूजल पातळीची दुसरी पाहणी फेब्रुवारीत होणार आहे. त्यावेळी उन्हाळ्यातील परिस्थितीचा अंदाज येईल.बी. एस. मेश्राम, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

जिल्हा            भूजल पातळी वाढ (प्रति मीटर)औरंगाबाद २.११जालना २.५०परभणी ३.९४हिंगोली १.१६नांदेड १.२१लातूर ४.३७उस्मानाबाद ३.८५बीड ३.१६

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाWaterपाणी