शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 14:57 IST

लातुरात सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत कमी वाढ

औरंगाबाद : ‘टँकरवाडा’ ही ओळख मिटवत सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याच्या भूजल पातळीत २.७९ मीटरने वाढ झाली ( Groundwater level in Marathwada ) आहे. यंदा पावसाची मराठवाड्यावर कृपादृष्टी राहिली. यामुळे दुष्काळाची सावट मिटले आहे.

मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक भूजल पातळी ४.३७ मीटरने वाढली आहे. सर्वांत कमी १.१६ मीटरची वाढ हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. भूजल पातळी ३.९४ मीटरने वाढून परभणी दुसऱ्या स्थानावर आहे, तर २.११ मीटरने भूजल पातळी वाढून औरंगाबाद ६ व्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये सरासरी पाणीपातळी २.०३ मीटर एवढी होती. मराठवाड्यात १११२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी या कालावधीत सरासरी ६७९.५ मिमी पाऊस होतो. परतीच्या पावसाने काही जिल्ह्यांत ढगफुटीसारखा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता रब्बी पिकांना या भूजल पातळी वाढल्याचा मोठा फायदा होणार आहे. हवामान पोषक राहिले तर गहू, ज्वारी अन्य पिके जोमात येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच टँकरवर अवलंबून राहणाऱ्या गावांची संख्या तुरळक राहील.

सोनपेठ तालुक्यात विक्रमी वाढभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील ८७५ निरीक्षण विहिरीच्या पाणीपातळीची तपासणी केली. ७६ तालुक्यांतील या निरीक्षण विहिरी आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे ०.२७ मीटरने भूजल पातळी वाढली. ही मराठवाड्यातील सर्वांत कमी वाढ आहे, तर सर्वाधिक परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील भूजल पातळीत ७.३५ मीटर एवढी विक्रमी वाढ झाली आहे. भूजल पातळीची दुसरी पाहणी फेब्रुवारीत होणार आहे. त्यावेळी उन्हाळ्यातील परिस्थितीचा अंदाज येईल.बी. एस. मेश्राम, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

जिल्हा            भूजल पातळी वाढ (प्रति मीटर)औरंगाबाद २.११जालना २.५०परभणी ३.९४हिंगोली १.१६नांदेड १.२१लातूर ४.३७उस्मानाबाद ३.८५बीड ३.१६

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाWaterपाणी