शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून अर्धे रोहिलागड अंधारात

By admin | Updated: July 28, 2014 00:58 IST

रोहिलागड: अंबड तालुक्यातील रोहिलागड गावातील सिंगलफेज योजनेची दोन रोहित्रे जळाल्याने मागील १५ दिवसांपासून अर्धेगाव अंधारात आहे.

रोहिलागड: अंबड तालुक्यातील रोहिलागड गावातील सिंगलफेज योजनेची दोन रोहित्रे जळाल्याने मागील १५ दिवसांपासून अर्धेगाव अंधारात आहे. ग्रामस्थांनी दुरूस्तीची मागणी केल्यानंतर थकबाकीचे कारण दाखवून महावितरणकडून नवीन रोहित्र देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.अंबड तालुक्यातील रोहिलागड हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे. गावात सिंगलफेज योजना आहे. यासाठी चार ठिकाणी रोहित्रे बसविण्यात आलेली आहेत. पैकी दोन रोहित्रे मागील १५ दिवसांपासून जळालेली आहेत. ही रोहित्रे दुरूस्तीसाठी ग्रामस्थांनी स्वयंखर्चांने जालना येथील महावितरणच्या कार्यालयात जमा केलेले आहे. मात्र अद्याप रोहित्राची दुरूस्ती झालेली नाही. किंवा नवीन रोहित्रे देखील ग्रामस्थांना दिलेली नाहीत. रोहित्राच्या मागणीसाठी ग्रामस्थ गेल्या पंधरा दिवसांपासून महावितरणच्या अंबड तालुक्यातील जामखेड येथील उपकेंद्रात व जालना येथील महावितरणच्या कार्यालयात खेटे मारत आहेत. ग्रामस्थांना वीज थकबाकीचे कारण दाखवण्यात येत आहे. थकबाकी भरा नंतर रोहित्र देऊ असे महावितरण करून सांगण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. महावितरणच्या या धोरणामुळे गावात मागील पंधरा दिवसांपासून अंधार असल्याने ग्रामस्थ महावितरण विरू द्ध संताप व्यक्त करत आहे. (वार्ताहर)खांबाला रोहित्राची प्रतिक्षा मागील पंधरा दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी महावितरच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील जळालेले दोन्ही रोहित्र खांबावरून काढले. स्वखर्चाने खाजगी वाहन करून ते जालन्याला नेले. मात्र अद्यापपर्यंत ते रोहित्र दुरूस्त करून मिळालेले नाही. त्यामुळे खांबांनाही रोहित्राची प्रतीक्षा करावी लागत आहे.सध्या मुस्लिम धर्माचा रमजान व हिंदू धर्मियांचा श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भारनियमन बंद केलेले आहे. तर दुसरीकडे या महिन्यात ग्रामस्थांना महावितरणच्या कारभारामुळे अंधारात राहण्याची वेळ आलेली आहे.