अन् निम्मे रुग्ण परतले !

By Admin | Updated: May 29, 2014 01:12 IST2014-05-29T00:49:57+5:302014-05-29T01:12:32+5:30

सिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात फक्त दोनच नेत्रतज्ज्ञ आल्याने निम्म्या रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

Half of the patients died! | अन् निम्मे रुग्ण परतले !

अन् निम्मे रुग्ण परतले !

सिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात फक्त दोनच नेत्रतज्ज्ञ आल्याने निम्म्या रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे अर्ध्या रुग्णांना शस्त्रक्रि या न करताच आल्या पावली परत जावे लागले. मंगळवारी तालुक्यातील ६० रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रि येसाठी रुग्णालयात दाखल झाले होते; परंतु बुधवारी शस्त्रक्रि येच्या दिवशी दोनच नेत्रतज्ज्ञ सर्जन आल्याने हा प्रकार घडला. गेल्या महिन्यातही नेत्रतज्ज्ञ सर्जन न आल्याने रुग्णांना शस्त्रक्रि या न करताच परत जावे लागले होते. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नियमितपणे मोतीबिंदू शस्त्रक्रि या शिबीर घेण्यात येते. या शिबिरामध्ये प्रत्येक महिन्याला ९० ते १०० रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रि या केली जाते. मोतीबिंदूची परिपूर्ण वाढ झाल्यानंतरच रुग्णाला शस्त्रक्रि येसाठी दाखल करून घेतले जाते. मोतीबिंदूच्या अशा रुग्णांवर वेळेवर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. वेळेवर शस्त्रक्रि या न झाल्यास रुग्णाला काचबिंदू होतो. ज्यामुळे नेत्र कायमस्वरूपी निकामी होऊन अंधत्व येते. मंगळवारी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रि येसाठी ६० रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी औरंगाबाद येथून प्रत्येक महिन्यात घेण्यात येणार्‍या शिबिराला ४ नेत्रतज्ज्ञ सर्जन येतात. परंतु बुधवारी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सुनीता गोलाईत, डॉ.रूपा अंबेकर हे दोनच सर्जन आल्याने ६० रुग्णांपैकी ३४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. २६ रुग्णांना शस्त्रक्रिया न करताच परतावे लागले. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर) महाराष्टÑात अव्वल तरीही... सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या सोयीसुविधा असल्याने जिल्ह्यासह जळगाव, बुलढाणा, जालना या बाहेरील जिल्ह्यांतील रुग्ण मोतीबिंदूची शस्त्रक्रि या करण्यासाठी येतात. दर महिन्यात ९० ते १०० तर वर्षभरात १०००ते ११०० रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. राज्यात ५० बेड असलेल्या कुठल्याही रुग्णालयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जात नाही. मोतीबिंदू शस्त्रक्रियेत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय महाराष्ट्रात अव्वल आहे; पण गेल्या दोन महिन्यांपासून नेत्रतज्ज्ञ सर्जनअभावी रुग्णांना शस्त्रक्रिया न करताच परत जावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. एक सर्जन रजेवर, तर दुसरा आजारी शिबिरासाठी ४ सर्जन येत असतात. परंतु दोन महिन्यांपासून दोन सर्जन येत आहे. दोनपैकी एक सर्जन रजेवर असून एकाची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आले नाही. यामुळे रुग्णांना परत जावे लागले. यापुढे रुग्णांना शस्त्रक्रिया न करता आल्या पावली परत जाण्याचा प्रकार घडणार नाही. यासाठी मी स्वत: याकडे गांभीर्याने लक्ष देईल. - डॉ.भूषणकुमार रामटेके, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय

Web Title: Half of the patients died!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.