शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

अर्धे शहर कचरामुक्तचा दावा फोल; महानगरपालिकेचे पितळ उघडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:12 IST

कोणताच वॉर्ड कचरामुक्त झालेला नाही. वॉर्डांमध्ये आजही कचरा पडूनच आहे. मात्र, महापालिकेने अर्धे शहर कचरामुक्त केल्याचा दावा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

ठळक मुद्देफसवणूक नेमकी कोणाची स्वत:ची पाठ थोपटून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना काय साध्य करायचे ?

लोकमत चमू : मुजीद देवणीकर, विकास राऊत, साहेबराव हिवराळे, राम शिनगारे, शेख मुनीर, सचिन लहाने

औरंगाबाद : राज्य शासनाने महापालिकेला ९० कोटी रुपये देऊन आठ महिने उलटले तरी अद्याप कचऱ्याचा प्रश्न किंचितही सोडविता आलेला नाही. शहरातील प्रत्येक वॉर्डात, सार्वजनिक रस्ते, दुभाजकांमध्ये कचऱ्याचे अक्षरश: डोंगर साचले असताना महापालिकेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी तब्बल ५१ वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली. ‘लोकमत’ चमूने बुधवारी मनपाने जाहीर केलेल्या ५१ वॉर्डांपैकी मोजक्याच वॉर्डांची पाहणी केली असता धक्कादायक चित्र समोर आले. कोणताच वॉर्ड कचरामुक्त झालेला नाही. वॉर्डांमध्ये आजही कचरा पडूनच आहे. मात्र, महापालिकेने अर्धे शहर कचरामुक्त केल्याचा दावा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

शहरातील नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याची सवय लावा, वॉर्डातील ओला कचरा वॉर्डात कंपोस्ट पद्धतीने जिरवा, कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारावीत, असे राज्य शासनाने सांगितले. यानंतर खंडपीठानेही सूचना दिली. महापालिका काहीच करायला तयार नाही. उलट अर्धे शहर कचरामुक्त केल्याची घोषणा करून औरंगाबादकरांची फसवणूक सुरू केली आहे. हा खोटारडेपणा मांडण्यासाठी महापालिकेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औैचित्य शोधावे का? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून दिल्ली आणि इतर शहरांमधून काही खाजगी संस्थांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही निविदा प्रक्रियेविना जनजागृतीचे काम सोपविले आहे. या संस्थांनी जिथे-जिथे थोडेफार काम केले त्या वॉर्डांना चक्क कचरामुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. ज्या ५१ वॉर्डांची कचरामुक्त म्हणून घोषणा झाली आहे, त्या वॉर्डांतील नागरिक, नगरसेवक आणि मनपा प्रशासनालाही वस्तुस्थितीची जाणीव आहे..

कुठे गेले प्रक्रिया केंद्रचिकलठाणा, पडेगाव येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. कंत्राटदार नियुक्त करून दोन महिने झाले तरी  मनपाला अद्याप साधा नारळ फोडता आला नाही. ३६ कोटी रुपये अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करण्यास, ७ वर्षे प्रक्रिया केंद्र चालविण्यासाठी देण्यात आले आहेत. २६ कोटी रुपये देऊन निव्वळ शेड उभारण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. मागील आठ महिन्यांत मनपाला साधे शेड उभारता आले नाहीत. यापेक्षा शहराचे दुसरे दुर्दैव असूच शकत नाही. महापालिकेच्या या भोंगळ कारभारासमोर राज्य शासनानेही हात टेकले, हे विशेष.

काही वॉर्ड अपवाद असतील...५१ पैकी ५१ वॉर्डांमध्ये कचऱ्याचे डोंगर असू शकत नाहीत. पूर्वीसारखा कचरा आता कुठेच नाही. काही ठिकाणी आज किंवा कालपासून कचरा उचलला नसेल असे दृश्य बघायला मिळू शकते. मनपाकडून कचरा उचलण्यास दिरंगाई झाली असेल. एखाद्या वॉर्डात अपवादाने कचरा सापडू शकतो. महापालिकेने मागील काही दिवसांमध्ये रात्रं-दिवस डोळ्या तेल घालून काम केले. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या काढून तेथे रांगोळ्या, वृक्षारोपण केले. आता तेथे नागरिक कचरा टाकत नाहीत. सकाळी घंटागाडीतच कचरा टाकतात. हा सकारात्मक बदल नक्कीच झाला आहे.-नंदकुमार घोडेले, महापौर

आम्ही कौतुकाची थाप दिली...शहरातील ११५ पैैकी ५१ वॉर्डांनी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेत भाग घेतला. वॉर्डातील नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, महिलांनी स्वच्छतेच्या उपक्रमात सहभाग घेतला. अनेक वसाहती हळूहळू कचरामुक्त झाल्या आहेत. आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी आदी ठिकाणी महिला स्वत:हून पुढे आल्या आहेत. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करीत आहेत. स्वच्छतेसाठी पुढाकार घेतलेल्या वॉर्डांना आम्ही फक्त कौैतुकाची थाप दिली. काही ठिकाणी थोडाफार प्रमाणात कचरा असू शकतो. आजच कचरा उचलला नसेलही. यात आणखी सुधारणा करण्यात येणारच आहे.-डॉ. निपुण विनायक, आयुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न