औराद शहाजानी : तेरणा नदी पात्रावरील असलेली पाच कोल्हापुरी बंधार्यातील पाणीसाठा नियमाप्रमाणे पावसाळ्यापूर्वी सोडला जातो़ याप्रमाणे सातपैकी पाच बंधार्यात पाणीसाठा आहे़ यातील पाणीसाठा सोडून देण्याची प्रक्रिया जलसिंचन विभागाने सुरु केली आहे़ तर पुढील वर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन आहे तो पाणीसाठा न सोडता साठवून ठेवावा म्हणून शेतकरी व ग्रामपंचायतीची मागणी आहे़ तेरणा नदी पात्रावर वांजरखेडा, तगरखेडा, औराद, सोनखेड, गुंजरगा, मदनसुरी व किल्लारी अशी सात कोल्हापुरी पाटबंधारे आहेत़ यातील गुंजरगा व किल्लारी या बंधार्यात पाणीसाठा संपला आहे़ हे बंधारे निरंक आहेत तर उर्वरित बंधार्यात वांजरखेडा बंधार्यात पाणीसाठा ०़२४६ दलघमी, तगरखेडा ०़२०५ दलघमी, औराद ०़९९३ दलघमी, सोनखेड ०़०३१ दलघमी, गुंजरगा निरंक, मदनसुरी ०़११२ दलघमी, किल्लारी निरंक असा साठा उपलब्ध आहे़ पण जलसिंचन विभाग दरवर्षी मान्सूनपूर्व पावसापूर्वी बंधार्यातील पाणीसाठा ३१ मे पूर्वी सोडून देत असते़ पाऊस जास्त झाला तर बंधार्यास धोका निर्माण होतो व त्याची दारे स्वयंचलित असल्यामुळे पुन्हा ते काढता येत नाहीत़ म्हणून प्रशासन दारे उघडे करत असते़ दरम्यान औरादचे सरपंच दिलीप कांबळे, उपसरपंच डॉ़ मल्लिकार्जुन शंकद म्हणाले की, औराद शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी योजना बंद पडली आहे़ बंधार्यात पाणी राहिले तर विंधन विहिर व विहिरीमार्फत पाणीपुरवठा होऊ शकतो, होत आहे़ पाणी सोडले तर पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे़ म्हणून आम्ही ग्रामपंचायतीत पाणी न सोडण्याचा ठराव विभागाकडे दिला आहे़ याविषयी जलसिंचन शाखा अधिकारी अंगदराव गोरे म्हणाले की, नियमाप्रमाणे पाणी ३१ मे ला सोडावे लागते़ ग्रामपंचायची मागणी वरिष्ठांना कळवून त्यावर निर्णय घेऊ़ दरम्यान, महाराष्ट्रातील पाणीसाठा अशा पद्धतीने कर्नाटकात सोडून देणे भविष्यात पाणीटंचाई वाढविणे व सिंचन क्षेत्र घटविण्यासारखे असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे़
कर्नाटकात पाणी सोडण्यास ग्रामपंचायतीचा विरोध
By admin | Updated: May 23, 2014 00:18 IST