शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष, चिन्ह पळविण्याचे पाप लपविण्यासाठी सरकारने आणल्या फसव्या योजना: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:56 IST

मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वीजबिल माफीसह विविध योजना त्यांनी जाहीर केल्या. या योजना फसव्या आहेत. पक्ष फोडण्याचे पाप लपविण्यासाठी या योजना जाहीर केल्या.

छत्रपती संभाजीनगर : ‘पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेल्या राज्य सरकारने शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले. पक्षांची चिन्हे पळविण्याचे पाप केले. हे पाप लपविण्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीजमाफीसारख्या योजनांचा भडीमार केला आहे. या योजना फसव्या असून, त्या केवळ विधानसभा निवडणूक होईपर्यंतच देतील,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला. छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपासवर रविवारी उद्धवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. ‘जय भवानी, जय शिवराय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद’च्या घोषणांनी मेळाव्याला सुरूवात झाली.

या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही येथे आपला खासदार पराभूत झाला, याचे शल्य आहे. येथे विजय मिळवला म्हणून भ्रमात असलेल्या मिंधेंना (मुख्यमंत्री शिंदे) सांगायला आलो की, विधानसभा निवडणुकीत संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिंकल्याशिवाय राहणार नाही. अतिआत्मविश्वासाने लढलो असेल. पण जाऊ द्या, लोकसभा निवडणुकीत हरलो तरी लढण्याची हिम्मत हरलो नाही. तीन महिन्यांनतर विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या अस्मितेची ही लढाई आहे. लाचार आणि हरामखोर, गद्दारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, अशी शपथ घेऊन आगामी निवडणूक लढायची असल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारच्या विविध योजनांवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वीजबिल माफीसह विविध योजना त्यांनी जाहीर केल्या. या योजना फसव्या आहेत. पक्ष फोडण्याचे पाप लपविण्यासाठी या योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांना वीजमाफी काय देता, त्यांना दिवसा वीज द्या आणि त्यांची थकबाकी माफ करा, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, लक्ष्मण वडले यांचीही भाषणे झाली.

मतदारांना विचारा, आम्ही काय पाप केले?औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खैरे यांच्या पराभवाचे शल्य असल्याने गटप्रमुखांनी मतदार याद्या घेऊन प्रत्येक मतदाराकडे जावे आणि आमचे काय चुकले, आम्ही काय पाप केले, जेणेकरून तुम्ही शिवसेनेचा पराभव केला? असा प्रश्न मतदारांना विचारण्याचे आदेश त्यांनी दिले. दोन वर्षे झाली, शहराचे नामांतर केले; मात्र अजूनही मतदारसंघ आणि विमानतळाचे नाव ते बदलू शकले नसल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे