शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

पक्ष, चिन्ह पळविण्याचे पाप लपविण्यासाठी सरकारने आणल्या फसव्या योजना: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:56 IST

मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वीजबिल माफीसह विविध योजना त्यांनी जाहीर केल्या. या योजना फसव्या आहेत. पक्ष फोडण्याचे पाप लपविण्यासाठी या योजना जाहीर केल्या.

छत्रपती संभाजीनगर : ‘पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेल्या राज्य सरकारने शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले. पक्षांची चिन्हे पळविण्याचे पाप केले. हे पाप लपविण्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीजमाफीसारख्या योजनांचा भडीमार केला आहे. या योजना फसव्या असून, त्या केवळ विधानसभा निवडणूक होईपर्यंतच देतील,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला. छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपासवर रविवारी उद्धवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. ‘जय भवानी, जय शिवराय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद’च्या घोषणांनी मेळाव्याला सुरूवात झाली.

या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही येथे आपला खासदार पराभूत झाला, याचे शल्य आहे. येथे विजय मिळवला म्हणून भ्रमात असलेल्या मिंधेंना (मुख्यमंत्री शिंदे) सांगायला आलो की, विधानसभा निवडणुकीत संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिंकल्याशिवाय राहणार नाही. अतिआत्मविश्वासाने लढलो असेल. पण जाऊ द्या, लोकसभा निवडणुकीत हरलो तरी लढण्याची हिम्मत हरलो नाही. तीन महिन्यांनतर विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या अस्मितेची ही लढाई आहे. लाचार आणि हरामखोर, गद्दारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, अशी शपथ घेऊन आगामी निवडणूक लढायची असल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारच्या विविध योजनांवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वीजबिल माफीसह विविध योजना त्यांनी जाहीर केल्या. या योजना फसव्या आहेत. पक्ष फोडण्याचे पाप लपविण्यासाठी या योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांना वीजमाफी काय देता, त्यांना दिवसा वीज द्या आणि त्यांची थकबाकी माफ करा, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, लक्ष्मण वडले यांचीही भाषणे झाली.

मतदारांना विचारा, आम्ही काय पाप केले?औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खैरे यांच्या पराभवाचे शल्य असल्याने गटप्रमुखांनी मतदार याद्या घेऊन प्रत्येक मतदाराकडे जावे आणि आमचे काय चुकले, आम्ही काय पाप केले, जेणेकरून तुम्ही शिवसेनेचा पराभव केला? असा प्रश्न मतदारांना विचारण्याचे आदेश त्यांनी दिले. दोन वर्षे झाली, शहराचे नामांतर केले; मात्र अजूनही मतदारसंघ आणि विमानतळाचे नाव ते बदलू शकले नसल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे