शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

वचनपूर्ती न करणारे सरकार छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला जबाबदार: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 19:38 IST

पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगा; शिंदेसेना आणि भाजपवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर: शहरात पाणी प्रश्न भीषण झालेला आहे, याला कोणत्याही वचनांची पूर्तता न करणारे सरकार जबाबदार आहे, हे सरकारी अपयश आहे, असा हल्लाबोल ठाकरेसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. या सरकारने अनेक वचने दिले, पण त्याची पूर्तता केली नाही. राज्यात नागरिक, शेतकरी, महिला सर्वांवर अन्याय वाढत आहे. मात्र, सरकारकडून कोणतीही वचनपूर्ती होत नाही. पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगावी, अशी सडेतोड टीकाही त्यांनी शिंदेसेना आणि भाजपवर यावेळी केली. ते ठाकरेसेनेच्या लबाडांनो पाणी द्या या शहर पाणी प्रश्नावरील आंदोलनाच्या समारोपात मोर्चासाठी शहरात आले होते.

मागील महिनाभरापासून शहर पाणीप्रश्नावर ठाकरेसेनेचे लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन सुरू आहे. शहरातील विविध भागात कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पाणी प्रश्नावर संताप व्यक्त केला. या आंदोलनांचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिकेवर हल्लाबोल माेर्चा नेऊन होत आहे. क्रांती चौकातून सायंकाळी मोर्चास सुरुवात झाली. लबाडांनो पाणी द्या, असे बॅनर हातात घेऊन काही आंदोलक सहभागी होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेकडे रवाना झाले.

१६८० कोटींची योजना २७४० कोटींची कशी झालीनवीन पाणी पुरवठा योजना १६८० कोटी रुपयांची होती. नंतर ती २७४०कोटी रुपयांची कशी झाली, असा सवाल आ. अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मार्गी लागलेले काम आता अत्यंत संथगतीने चालू आहे. या योजनेचे काम ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधाऱ्याचा वचक नसल्याने योजनेचे काम दोन वर्ष पूर्ण होऊ शकत नसल्याचे आ.दानवे यांनी नमूद केले.

ठाकरेसेनेवर भाजपचा पलटवारठाकरे गट सोंग करीत असून मोर्चाचे ढोंग करीत आहे. मनपात सत्तेत असताना सर्वाधिक महापौर त्यांचे राहिले. त्यांच्या काळात पाणीपुरवठ्याचे वाटोळे होण्यासह अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला. त्यामुळे खरी लबाडी ठाकरे गटाने केल्याची टीका भाजपचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी महापौर बापू घडमोडे यांनी केला.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरwater shortageपाणीकपात