शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासंबंधी सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून राज्यभर पेटलेले आंदोलन आता आवाक्याबाहेर गेल्यामुळे राज्यभरातील सर्व संघटनांची मोट ...

ठळक मुद्देकालबद्ध कार्यक्रमाची मागणी : मराठा समाजातील युवकांनी आत्महत्या, जाळपोळ थांबविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून राज्यभर पेटलेले आंदोलन आता आवाक्याबाहेर गेल्यामुळे राज्यभरातील सर्व संघटनांची मोट बांधून शांततेच्या मार्गाने लढा देण्यासाठी व्यापक बैठक घेण्याचा निर्णय सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. समाजातील युवकांनी आत्महत्या करू नये, तसेच जाळपोळ तथा हिंसाचार करणाऱ्या घटनांंत पुढाकार घेऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. राज्यव्यापी बैठक न्या. देशमुख यांच्या उपस्थितीत औरंगाबादलाच होईल, तिची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, असे उद्योजक मानसिंग पवार यांनी जाहीर केले.राज्यभरातील समाजातील ज्येष्ठ मान्यवर व संघटनांच्या नेत्यांना बोलावून त्या बैठकीत सरकार व समाजाला मार्गदर्शन करणारा व्यापक विचार पुढे यावा, असे न्या. देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठरले.सेवानिवृत्त न्यायमूर्ती देशमुख म्हणाले की, गेली अनेक वर्षे अहिंसेच्या मार्गानेच आंदोलने सुरू होती. मागील दोन वर्षेदेखील समाजाने शांततेने काढण्यात आलेल्या मोर्चातून ऐतिहासिक संदेश दिला. असे असताना सरकार काहीही निर्णय घेत नसल्यामुळे समाजाच्या शांततेचा संयम सुटला आहे. त्यामुळे समाजाला शांततेचे आवाहन करणे आवाक्याबाहेर झाले आहे. यासाठी सरकारने तातडीने आरक्षण व इतर मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलून कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. शासनाने सकारात्मक पाऊल उचलले, तर समाजाला शांततेचे आवाहन करण्यास बळ मिळेल. महाराष्ट्र पेटलेला असताना केंद्रीय नेतृत्व यावर काहीही बोलत नाही, असा मुद्दा उपस्थित करीत न्या. देशमुख म्हणाले की, आंदोलन तीव्र असावे; परंतु जाळपोळ, दहशत, आत्महत्येसारखे प्रकार नसावेत. सरकारवर दबाव वाढला पाहिजे; पण त्यात हिंसा नसावी. आज सरकार पोलिसांवर भिस्त ठेवून आहे. उद्या सरकार सैन्याचा किंवा शस्त्रसंधीचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करील. समाजाने हिंसा करून सरकारला तसे करण्यासाठी पूरक ठरू नये. सरकारला हे करणे तेवढे सोपे नाही; परंतु तसे पाऊल सरकारने उचलले, तर समाजातील तरुणांचे नुकसान होईल.औरंगाबाद शहरात मे महिन्यात दंगल झाली. त्यानंतर कचरा प्रश्नामुळे शहर पेटले. आता या आंदोलनामुळे शहर धुमसत आहे. या सगळ्या घटनांचा परिणाम उद्योग, शहर, समाज आणि विभागाच्या विकासावर होतो आहे. ४ युवकांनी आत्महत्या केली आहे. आंदोलकांना विनंती आहे की, त्यांनी जाळपोळ, हिंसेऐवजी अहिंसेने हे आंदोलन पुढे न्यावे, असे उद्योजक पवार यांनी नमूद केले.बैठकीला रमेश गायकवाड, प्रमोद खैरनार, प्रदीप पाटील, साकेत भांड, विवेक भोसले, जयराज पाथ्रीकर, सुभाष शेळके, औताडे यांची उपस्थिती होती. उद्योजक पद्माकर मुळे, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे आणि एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम हेदेखील बैठकीला येणार होते; परंतु काही कामामुळे त्यांनी समन्वयकांशी चर्चा करून येणार नसल्याचे सांगितले. या बैठकीला मराठा समाजासाठी विविध माध्यमांतून काम करणाºया संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत अनेकांनी मांडल्या सूचनाया बैठकीला प्रा. प्रतापराव बोराडे, उद्योजक मानसिंग पवार, बी.एस. खोसे, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे यांनी विविध सूचना करून प्रस्ताव मांडले. मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या आंदोलनात फूट पाडण्याचेदेखील प्रयत्न होत आहेत. त्यामुळे समाजमनावर त्याचे परिणाम होत असून, त्याचा भडका आंदोलनाला हिंसक वळण लागण्यातून उडतो आहे. समाजाला आंदोलन परवडणारे नाही, तसेच युवकांच्या आत्महत्यांनीदेखील प्रश्न सुटणार नाही, उलट प्रश्न वाढतील, असे प्रा. भराट म्हणाले. वाकडे म्हणाले की, जिल्हानिहाय संघटनांची राज्यव्यापी बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले जावे. खोसे म्हणाले की, कालबद्ध कार्यक्रम राबविणे आणि मेगा भरतीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने तातडीने घेतला पाहिजे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन