शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

आरक्षणासंबंधी सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून राज्यभर पेटलेले आंदोलन आता आवाक्याबाहेर गेल्यामुळे राज्यभरातील सर्व संघटनांची मोट ...

ठळक मुद्देकालबद्ध कार्यक्रमाची मागणी : मराठा समाजातील युवकांनी आत्महत्या, जाळपोळ थांबविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून राज्यभर पेटलेले आंदोलन आता आवाक्याबाहेर गेल्यामुळे राज्यभरातील सर्व संघटनांची मोट बांधून शांततेच्या मार्गाने लढा देण्यासाठी व्यापक बैठक घेण्याचा निर्णय सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. समाजातील युवकांनी आत्महत्या करू नये, तसेच जाळपोळ तथा हिंसाचार करणाऱ्या घटनांंत पुढाकार घेऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. राज्यव्यापी बैठक न्या. देशमुख यांच्या उपस्थितीत औरंगाबादलाच होईल, तिची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, असे उद्योजक मानसिंग पवार यांनी जाहीर केले.राज्यभरातील समाजातील ज्येष्ठ मान्यवर व संघटनांच्या नेत्यांना बोलावून त्या बैठकीत सरकार व समाजाला मार्गदर्शन करणारा व्यापक विचार पुढे यावा, असे न्या. देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठरले.सेवानिवृत्त न्यायमूर्ती देशमुख म्हणाले की, गेली अनेक वर्षे अहिंसेच्या मार्गानेच आंदोलने सुरू होती. मागील दोन वर्षेदेखील समाजाने शांततेने काढण्यात आलेल्या मोर्चातून ऐतिहासिक संदेश दिला. असे असताना सरकार काहीही निर्णय घेत नसल्यामुळे समाजाच्या शांततेचा संयम सुटला आहे. त्यामुळे समाजाला शांततेचे आवाहन करणे आवाक्याबाहेर झाले आहे. यासाठी सरकारने तातडीने आरक्षण व इतर मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलून कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. शासनाने सकारात्मक पाऊल उचलले, तर समाजाला शांततेचे आवाहन करण्यास बळ मिळेल. महाराष्ट्र पेटलेला असताना केंद्रीय नेतृत्व यावर काहीही बोलत नाही, असा मुद्दा उपस्थित करीत न्या. देशमुख म्हणाले की, आंदोलन तीव्र असावे; परंतु जाळपोळ, दहशत, आत्महत्येसारखे प्रकार नसावेत. सरकारवर दबाव वाढला पाहिजे; पण त्यात हिंसा नसावी. आज सरकार पोलिसांवर भिस्त ठेवून आहे. उद्या सरकार सैन्याचा किंवा शस्त्रसंधीचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करील. समाजाने हिंसा करून सरकारला तसे करण्यासाठी पूरक ठरू नये. सरकारला हे करणे तेवढे सोपे नाही; परंतु तसे पाऊल सरकारने उचलले, तर समाजातील तरुणांचे नुकसान होईल.औरंगाबाद शहरात मे महिन्यात दंगल झाली. त्यानंतर कचरा प्रश्नामुळे शहर पेटले. आता या आंदोलनामुळे शहर धुमसत आहे. या सगळ्या घटनांचा परिणाम उद्योग, शहर, समाज आणि विभागाच्या विकासावर होतो आहे. ४ युवकांनी आत्महत्या केली आहे. आंदोलकांना विनंती आहे की, त्यांनी जाळपोळ, हिंसेऐवजी अहिंसेने हे आंदोलन पुढे न्यावे, असे उद्योजक पवार यांनी नमूद केले.बैठकीला रमेश गायकवाड, प्रमोद खैरनार, प्रदीप पाटील, साकेत भांड, विवेक भोसले, जयराज पाथ्रीकर, सुभाष शेळके, औताडे यांची उपस्थिती होती. उद्योजक पद्माकर मुळे, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे आणि एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम हेदेखील बैठकीला येणार होते; परंतु काही कामामुळे त्यांनी समन्वयकांशी चर्चा करून येणार नसल्याचे सांगितले. या बैठकीला मराठा समाजासाठी विविध माध्यमांतून काम करणाºया संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत अनेकांनी मांडल्या सूचनाया बैठकीला प्रा. प्रतापराव बोराडे, उद्योजक मानसिंग पवार, बी.एस. खोसे, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे यांनी विविध सूचना करून प्रस्ताव मांडले. मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या आंदोलनात फूट पाडण्याचेदेखील प्रयत्न होत आहेत. त्यामुळे समाजमनावर त्याचे परिणाम होत असून, त्याचा भडका आंदोलनाला हिंसक वळण लागण्यातून उडतो आहे. समाजाला आंदोलन परवडणारे नाही, तसेच युवकांच्या आत्महत्यांनीदेखील प्रश्न सुटणार नाही, उलट प्रश्न वाढतील, असे प्रा. भराट म्हणाले. वाकडे म्हणाले की, जिल्हानिहाय संघटनांची राज्यव्यापी बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले जावे. खोसे म्हणाले की, कालबद्ध कार्यक्रम राबविणे आणि मेगा भरतीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने तातडीने घेतला पाहिजे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन