उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार
By Admin | Updated: June 9, 2014 01:05 IST2014-06-09T01:00:36+5:302014-06-09T01:05:11+5:30
औरंगाबाद : शिवसेनेची शिवशाही हेच खरे बळीचे राज्य असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार
औरंगाबाद : शिवसेनेची शिवशाही हेच खरे बळीचे राज्य असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे. हेच सरकार राज्यातील सर्व घटकांना न्याय देईल, असे सांगत शिवसेनेचे उपनेते व चित्रपट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा आज पुढे केले.
शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलत होते. खा. चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, किशनचंद तनवाणी, लता दलाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. हर्षवर्धन जाधव, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
लोकसभेत मोठे मताधिक्य दिल्याबद्दल मतदारांना दंडवत घालून खा. खैरे यांनी, येणाऱ्या विधानसभेत मराठवाड्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन उपस्थिताना केले. सत्तेचा वापर पक्षासाठी करा, पक्षांतर्गत कुजबुज बंद करा, अशा कार्यकर्त्यांना सूचना करून ते म्हणाले, आम्हाला विसरा; परंतु उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना विसरू नका.
महिलांना काम करू द्या- कला ओझा
महापौर कला ओझा यांनी तडाखेबाज भाषण केले. त्या म्हणाल्या, महापालिकेत युतीची सत्ता आहे. महापालिकेत महिलांना व्यवस्थित काम करू द्या. विधानसभेसाठी एखाद्या महिलेला संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
आ. जाधव, सुहास दाशरथे, अंबादास दानवे आदींची यावेळी भाषणे झाली. तत्पूर्वी गोपीनाथ मुंडे, विलास अवचट, विलास भानुशाली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
गरजूंना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. गोरक्षणासाठी आठ ट्रक चारा वाटप करण्यात आला.