शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

मराठवाड्यासाठी आनंदवार्ता ! मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 3:21 PM

Marathwada Water Issue : गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली.

ठळक मुद्देपूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत.पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापरता येणार

औरंगाबाद : विजयादशमीच्या मुहूर्तावर मराठवाड्यासाठी आनंदाची ( Marathwada Water Issue)  बातमी आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी ( Central Godavari sub-basin) अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली असून, यामुळे पाण्याविना रखडलेल्या अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत. पाणी वापराचा तंटा सुटल्याने नवीन प्रकल्पांची कामे होणे शक्य होणार आहे.

गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार ६ ऑक्टोबर १९७५ पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित ठेवून शुक्रवारी जलसंपदामंत्री पाटील यांनी अतिरिक्त पाणी वापराच्या संचिकेवर सही केली. पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी जलसंपदा विभागाने दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी मिळाली. पूर्वीचे ६० टीएमसी आणि आताचे ६१.२९ टीएमसी म्हणजे १२१.२९ टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते त्यातील काही प्रकल्पांत पाणी उपलब्धता आहे आणि उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले, तर सुरू करता येतील. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे दूर झाले आहेत.

विभागासाठी ऐतिहासिक निर्णय आहेगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी सांगितले, हा मराठवाड्यासाठी ऐतिहासिक निर्णय आहे. १९७५ पूर्वीचा पाणी वापर अबाधित ठेवून निर्णय झाला आहे. परभणी, नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी याचा लाभ होणार असून, नवीन काही प्रकल्प यामुळे शक्य होणार आहेत.

रखडलेले प्रकल्प पूर्ण होतीलमराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यातील मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९७५ चा पाणी वापर संरक्षित होता. त्यातील त्रुटी दुरुस्त केल्याने १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. या संचिकेवर आजच सही केली आहे. मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे. हे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते. ते पूर्ण करता येतील. बीड, हिंगोली, नांदेड येथील प्रकल्पांच्या अडचणी दूर होतील.- जयंत पाटील, जलसंपदामंत्री

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाgodavariगोदावरीWaterपाणी