शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मातीतून निघालेले सोने मातीतच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 1:53 PM

जुई नदीकाठावरील शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

ठळक मुद्देअतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका 

- रघुनाथ सावळे

उंडणगाव (जि. औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात तळहाताच्या फोडांप्रमाणे जगविलेली पिके अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नदीच्या पुरात वाहून गेली. मातीतून निघालेले सोने मातीतच मिसळल्याने येथील बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, सध्या परिसरात प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू असले तरी आर्थिक मदत मिळणार कधी, याकडे हजारो शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळपास २० दिवसांपासून परिसरात कधी रिमझिम तर कधी जोरदार वृष्टी झाल्याने येथील मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, ज्वारी आदी पिके हातातून गेली. सध्या येथील बहुतांश शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, विशेषत: येथील जुई नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा अधिक फटका बसला आहे. नदीने रौद्ररूप धारण करून काठावरील मका, सोयाबीन, भाजीपाला ही सर्वच्या सर्व पिके आपल्या कवेत घेतल्याने बळीराजा अक्षरश: रस्त्यावर आला आहे.

उंडणगावसह खुल्लोड, विरगाव, वसई, जळकी, खंडाळा, मोहाळ आदी गावांत शेतकऱ्यांनी काढणी केलेले मक्याचे पीक अक्षरश: कुजले असून, कपाशीच्या कैऱ्यांना झाडावरच कोंब फुटले. तसेच सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मिरची, अद्रक आदी पिकांचे मातेरे झाले.  शेतांमध्ये पाणी साचलेले असल्याने येणाऱ्या रबी हंगामात पीक कसे येणार, या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

गतवर्षी ११० क्विंटल पीक, यावर्षी मात्र हाती भोपळा उंडणगाव येथील महिला शेतकरी तान्हाबाई विठ्ठल नरवडे म्हणाल्या, गतवर्षी आम्ही मक्याचे ११० क्विंटल पीक घेतले होते. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने पूर्ण मका उद्ध्वस्त झाल्याने एक किलोभराही पीक शिल्लक राहिले नाही. याबाबत मक्यावर केलेला खर्चही निघणार नसल्याने पतीने या पिकासाठी घेतलेले कर्ज, उसनवारी कशी फेडणार याची सध्या चिंता आहे. 

नुकसानीचे आकडे मोठे परिसरातील जवळपास १०० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीचे आकडे हे खूपच मोठे आहेत. त्याचे गणित लावणे अशक्यच आहे. एकीकडे बळीराजा संकटात असताना महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचामुळे नुकसानभरपाई मिळेल किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRainपाऊस