शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:49 AM

नांदूर-मधमेश्वरमधून ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

ठळक मुद्देमराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकवरून गोदावरी, दारणा या नद्यांनी धाव घेतली

- अझहर शेख   

औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा खालावलेला असताना तहानलेल्या मराठवाड्यातील औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पुन्हा नाशिकवरून गोदावरी, दारणा या नद्यांनी धाव घेतली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबेकश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांत रविवारपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे भावली, दारणासह गंगापूर धरणातूनही हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदा-कादवा संगमावर असलेल्या नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्याचे पाचही दरवाजे मंगळवारी (दि.३०) उघडण्यात आले. हे सर्व पाणी जायकवाडीच्या दिशेने वेगाने जात आहे.रविवारपासून (दि.२८) इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. यामुळे इगतपुरीतील भावली धरण शंभर टक्के भरले असून, शनिवारपासून (दि.२७) ४८१ क्युसेकने त्यामधून विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच दारणामधूनही १ हजार क्युसेकने विसर्गाला प्रारंभ करण्यात आला. दारणाचा साठा ८५ टक्के झाला आहे.

मंगळवारी दारणामधून १३ हजार, गंगापूर धरणातून ८ हजार ८३३ आणि भावलीमधून ९४८ क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. एखाद्या समुद्राला भरती यावी आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांनी उंचच उंच उसळ्या घ्याव्या याप्रमाणे दृश्य नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यासमोर पहावयास मिळाले. प्रचंड वेगाने ५८ हजार क्युसेक (१६४ कोटी १९ लाख ८० हजार लिटर प्रति सेकंद) इतके पाणी जायकवाडीच्या दिशेने गोदापात्रातून प्रवाहित झाले आहे. दारणा, भावली गंगापूर धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात एकत्र येते. येथून हजारो क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात निश्चितच वाढ होणार आहे.

गोदावरीने गाठली धोक्याची पातळीगोदावरीमध्ये गंगापूरमधून मंगळवारी दुपारी ८ हजार ८३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच शहरातदेखील संततधार पहाटेपासून सुरू असल्यामुळे पंचवटी रामकुंडापासून पुढे नदीपात्रात ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात प्रवाहित झाले. त्यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून, निफाड तालुक्यातील गोदाकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सायंकाळपर्यंत याच वेगाने विसर्ग सुरू होता. पाणलोटक्षेत्रात पाऊस वाढल्यास विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :godavariगोदावरीJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसMarathwadaमराठवाडा