शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

जेथे स्वॅब दिला तिथे जा; कोरोना तपासणी अहवाल दोन दिवसांनंतरही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 6:42 PM

जर एखादा संशयित क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असेल, तर त्याने कशी विचारणा करावी, असा प्रश्न होत आहे.

ठळक मुद्देव्यक्ती क्वारंटाईन असली तरी त्यांच्यावर चिंतेची टांगती तलवार कायम आहे. 

औरंगाबाद : शहरात कोरोना संशयित रुग्णांचा अहवाल दोन दिवसांनंतरही मिळत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे संशयितांना क्वारंटाईन सेंटरमध्येच राहावे लागत असून, या रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची घालमेल होत आहे.

एन-२ येथील एका कुटुंबाने १३ जुलै रोजी एमजीएम येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे स्वॅब दिले होते; परंतु त्यांना अहवालाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. विद्यापीठात क्वारंटाईन असलेल्या सेव्हन हिल परिसरातील एका कुटुंबातील तिघांनाही दोन दिवसांपासून अहवाल मिळण्याची नुसती वाट पाहावी लागत आहे. शहरात असाच प्रकार अन्य संशयित रुग्णांसोबत होत आहे.

स्वॅब नमुने घेतल्यानंतर २४ तासांत अहवाल येणे अपेक्षित आहे; परंतु शहरात अनेकांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. संशयित रुग्णांना  क्वारंटाईन केल्यानंतर दोन दिवस उलटूनही अहवाल मिळत नाही. यातून जर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या उपचाराला विलंब होण्याची शक्यता आहे. 

जेथे स्वॅब दिला तिथे जा...मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अन्य अधिकाऱ्यांनी फोन घेतला. त्यांना अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याबद्दल विचारणा केली, तेव्हा त्यांचे उत्तर,‘ जिथे स्वॅब दिला तिथे विचारणा करा,’ असे अजब उत्तर होते. जर एखादा संशयित क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असेल, तर त्याने कशी विचारणा करावी, असा प्रश्न होत आहे. त्यामुळे व्यक्ती क्वारंटाईन असली तरी त्यांच्यावर चिंतेची टांगती तलवार कायम आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद