शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य व विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींचा गौरव

By admin | Updated: March 5, 2015 00:02 IST

लातूर : दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

लातूर : दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर बोर्डात प्रथम येणाऱ्यास प्रत्येकी ५१ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या पुरस्काराने गौरविले जाईल. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने गेल्या २५ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेतला असून, राज्यस्तरावर दरवर्षी १ जुलै रोजी या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी १ लाख रुपये देऊन सन्मान केला जाईल. २ लाख रुपये या पुरस्कारासाठी खर्च केले जातील. तर बोर्डामध्ये याच प्रवर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी ५१ हजार रुपये असे ८.१६ लाख रुपये पुरस्कारावर खर्च केले जातील. बारावीच्या परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम आलेल्या मुला व मुलीस प्रत्येकी १ लाख असे २ लाख तर बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी ५१ हजार रुपये देऊन पुरस्कार दिला जाईल. असे एकूण ८.१६ लाख रुपये बोर्डातील विद्यार्थ्यांवर खर्च होईल. २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना अंमलात आली आहे. योजना केवळ विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींसाठी आहे़ (प्रतिनिधी)विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाने पारितोषीक योजना जाहीर केली आहे़ विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या प्रवर्गातून राज्यात प्रथम येणाऱ्या दहावीच्या व बारावीच्या मुलांना व मुलींना प्रत्येकी १ लाख रुपयाचे पारितोषीक गौरवपूर्वक दिले जाणार आहे़ शिवाय, दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींनाही प्रत्येकी रोख ५१ हजार रुपये या योजनेत पारितोषीक आहे़ उच्च माध्यमिक शिक्षणातील या प्रवर्गातील मुला-मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना शासनाने सुरु केली आहे़