‘टीबी’चे रूग्णांची सोय सामान्य वॉर्डात

By Admin | Updated: May 19, 2014 01:04 IST2014-05-19T00:54:24+5:302014-05-19T01:04:06+5:30

उस्मानाबाद: जिल्हा रूग्णालयातील टीबी वॉर्ड चतुर्थश्रेणीचे कर्मचारी कमी असल्याचे कारण पुढे करत गत एक महिन्यापासून बंद ठेवण्यात आला आहे़

General Ward's facility for TB patients | ‘टीबी’चे रूग्णांची सोय सामान्य वॉर्डात

‘टीबी’चे रूग्णांची सोय सामान्य वॉर्डात

उस्मानाबाद: जिल्हा रूग्णालयातील टीबी वॉर्ड चतुर्थश्रेणीचे कर्मचारी कमी असल्याचे कारण पुढे करत गत एक महिन्यापासून बंद ठेवण्यात आला आहे़ कहर म्हणजे संसर्गजन्य अजार असताना टीबीचे रूग्ण सामान्य वॉर्डात ठेवण्यात येत आहेत़ जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या या प्रतापामुळे मात्र, सर्वसामान्य रूग्णांसह नातेवाईकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे़ विविध आजारांमध्ये टी़बी़ (क्षयरोग) हा संसर्गजन्य आणि धोकादायक अजार म्हणून ओळखला जातो़ आजारावर औषधोपचार वेळेत घेतल्यास तो आजार बराही होतो़ जिल्हा रूग्णालयात अल्पदरात सेवा मिळत असल्याने शहरासह जिल्हाभरातील अनेक रूग्ण येथे उपचारासाठी येतात़ विविध अजारांनी ग्रस्त रूग्णांना शासकीय रूग्णालयातील विविध वॉर्डामध्ये अ‍ॅडमिट करून घेण्यात येते़ मात्र, रूग्णालयातील लिफ्टसह इतर अनेक समस्यांनी रूग्णांसह नातेवाईकांतून वारंवार ओरड होत असते़ तर वैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर राहत नसल्याने तासन्तास नागरिकांना त्यांची वाट पाहत बसावी लागते़ वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या या कारभाराचा जिल्हाधिकारी डॉ़ नारनवरे यांनी एकवेळेस पंचनामाही केला आहे़ या पंचनाम्यानंतर काही दिवस वगळता इतरत्र वेळी मात्र, हा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप नागरिकांसह रूग्णांमधून होत आहे़ या कारभारावर कळस चढवित जिल्हा रूग्णालयातील टीबी वॉर्ड चतुर्थश्रेणीचे कर्मचारी कमी असल्याने बंद करण्यात आला आहे़ गत एक महिन्यापासून हा वॉर्ड बंद असून, टी़बी़वर उपचार घेण्यासाठी अ‍ॅडमिट होणार्‍या रूग्णांना चक्क सामान्य वॉर्डात दाखल करण्यात येत आहे़ टी़बी़ हा संसर्गजन्य अजार असल्याचे माहिती असताना वैद्यकीय अधिकार्‍यांनी ‘काळजी’ घेवू, घ्या अशा सूचना परिचारिकांसह कर्मचार्‍यांना देत हा प्रताप केला आहे़ वरिष्ठ अधिकार्‍यांचा हा कारभार म्हणजे इतर अजारांनी पिडीत असलेल्या रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार दिसत आहे़ यामुळे रूग्णांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान प्रसंगी अनेकांच्या जिवावरही हा प्रकार बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी या प्रकाराची चौकशी करून टी़बी़वॉर्ड पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ कर्मचार्‍यांअभावी अडचणी टी़बी़विभागाचे वैद्यकीय अधिकारी आऱ एऩ देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या विभागात असलेल्या चार चुतर्थश्रेणी कर्मचार्‍यांना बढती मिळाल्याने कामासाठी कर्मचारी अपुरे पडत आहेत़ जिल्हा रूग्णालयाकडून कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याचे सांगत कर्मचारी पुरविण्यात येत नाहीत़ तर उपलब्ध कर्मचार्‍यांवर रूग्णांची सेवा करताना अनेक अडचणी येत होत्या़ त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार रूग्णांना सामान्य वॉर्डात दाखल करण्यात येत आहे़ रूग्ण जास्तच अजारी आहे असे दिसून आल्यास त्यांच्यावर टी़बी़वॉर्डात उपचार करण्यात येतात़ ‘सीएस’ म्हणतात, मला माहिती नाही रूग्णांच्या जिवावर उठणार्‍या या प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक धाकतोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मी लातूरला मीटिंगसाठी आलो आहे़ मला त्याबाबत काही माहिती नाही़ आपण निवासी वैद्यकीय अधिकारी देशमुख यांच्याकडून माहिती घ्या’, असे त्यांनी सांगितले़ दोषीवर कारवाई करा जिल्हा रूग्णालयातील टी़बी़वार्डास कुलूप लावून ते रूग्ण सामान्य वॉर्डात अ‍ॅडमिट करण्यात येत आहेत़ याबाबत परिचारिकांशी संपर्क साधला असता वरिष्ठांनी टीबी वॉर्ड बंद करून ते रूग्ण कमी असल्याने टी़बी़चे रूग्ण कमी असल्याचे कारण देत सामान्य वार्डात त्या रूग्णांना अ‍ॅडमिट केले जात आहे़ त्यामुळे इतर रूग्णांनाही या रूग्णांपासून मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे़ त्यामुळे टी़बी़वार्ड सुरू करून या प्रकरणाची चौकशी करावी, दोषीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तुळजापूर येथील रौफ कुरशीद शेख यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़

Web Title: General Ward's facility for TB patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.