शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

कचऱ्यापासून गॅस निर्मिती मनपाच करणार; कांचनवाडीतील प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने

By मुजीब देवणीकर | Updated: January 6, 2023 17:08 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून ३० मे. टन क्षमतेचा प्रकल्प २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून आजपर्यंत ना बायोगॅस मिळतो, ना वीज मिळते.

औरंगाबाद : कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून गॅस, वीज निर्मिती प्रकल्प चालविण्यासाठी इंदूरच्या बँको कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मागील तीन वर्षांत कंपनीने गॅस, वीजनिर्मिती केलीच नाही. उलट मनपाला कोट्यवधी रुपयांचे बिल सादर केले. मनपाने कंपनीला करार रद्द करण्याची नोटीस दिली असून, प्रकल्प ताब्यात घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प भविष्यात मनपा प्रशासनच चालवेल, असे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

कोट्यवधी रुपये खर्च करून ३० मे. टन क्षमतेचा प्रकल्प २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून आजपर्यंत ना बायोगॅस मिळतो, ना वीज मिळते. तरीदेखील या प्रक्रिया केंद्रासाठी शहरातील सुमारे २० मे. टन एवढा ओला कचरा पुरविला जातो. बँको सर्व्हिसेसकडून हा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने पाहिजे त्या पद्धतीने कार्यवाही केली जात नाही. कांचनवाडी प्रक्रिया केंद्राचे सुमारे १० लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. हे वीज बिल बँको कंपनीने भरले नसल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी कांचनवाडी प्रक्रिया केंद्राचा वीजपुरवठा तोडण्यात आला. मनपाच्या घनकचरा विभागाने बँको सर्व्हिसेस एजन्सीला आतापर्यंत तीनदा नोटिसा बजावल्या. तरीदेखील बँकोने प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच मनपा प्रशासकांनी बोलावलेल्या बैठकीस बँकोचे प्रतिनिधी हजर राहिले नाहीत.

त्यामुळे घनकचरा विभागाने ५ डिसेंबर रोजी बँको सर्व्हिसेस एजन्सीला आपल्यासोबत मनपाने केलेला करार का रद्द करू नये, अशी नोटीस बजावली असून एका महिन्याच्या आत प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर येऊन खुलासा सादर करावा, असे म्हटले होते. त्यानुसार २० डिसेंबर रोजी आयुक्त डॉ. चौधरी यांच्यासमवेत कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीतही कंपनीच्या प्रतिनिधींनी कांचनवाडी प्रकल्पासंदर्भात कोणतीही भूमिका मांडली नाही. या संदर्भात डॉ. चौधरी म्हणाले की, कांचनवाडीचा बायोगॅस, वीज निर्मिती प्रकल्प महापालिकेने चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका