शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादकरांचा मनपा विरोधात गार्बेज वॉक, कचरा प्रश्नी केला जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 12:37 IST

. आजही शहरातील विविध वसाहतींमध्ये कचऱ्याला आग लावणे, मोठमोठे खड्डे करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. या विरोधात नागरिकांच्या वतीने आज सकाळी पैठण गेट येथून गार्बेज वॉकचे आयोजन करण्यात आले. 

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीचा आज ६१ वा दिवस असून महापालिका प्रशासन या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. बैठका, निविदा प्रक्रियेतच वेळ वाया घालविण्यात येत आहे. आजही शहरातील विविध वसाहतींमध्ये कचऱ्याला आग लावणे, मोठमोठे खड्डे करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. या विरोधात नागरिकांच्या वतीने आज सकाळी पैठण गेट येथून गार्बेज वॉकचे आयोजन करण्यात आले. 

विविध संघटना, नागरिक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पैठणगेट येथील स्व. गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून सकाळी ९.३० वाजता वॉकला सुरुवात झाली. गुलमंडी, रंगारगल्ली, बुढीलेनमार्गे वॉक महापालिकेवर धडकला. 'नागरिकांचा एकच जागर, स्वच्छ राखू आपल शहर' , शहर मे गंदगी परेशान जिंदगी' अशा आशयाची विविध बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मनपा कार्यालयात महापौर नंदकुमार घोडेले व अतिरिक्त आयुक्त यांनी नागरिकांशी चर्चा केली. ‘गार्बेज वॉक’ मध्ये आमदार सुभाष झांबड, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, औरंगाबाद कनेक्ट टीमचे सारंग टाकळकर, लोकमतचे संपादक सुधीर महाजन, अमनसिंग पवार, समीर राजूरकर, प्रदीप पुरंदरे, श्रीकांत उमरीकर आदींचा सहभाग होता. 

महिना अखेरीस शहर स्वच्छ नागरिकांच्या निवेदनावर बोलताना महापौर व अतिरिक्त आयुक्त यांनी शहरातील संपूर्ण कचरा ३० एप्रिल पर्यंत उचला जाईल असे आश्वासन दिले. यासोबतच मे महिन्या अखेरपर्यंत सर्व झोनमध्ये कचरा प्रक्रिया मशीन्स लावल्या जातील अशी माहिती दिली.  

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpaithan gateपैठण गेट