शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

औरंगाबादकरांचा मनपा विरोधात गार्बेज वॉक, कचरा प्रश्नी केला जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 12:37 IST

. आजही शहरातील विविध वसाहतींमध्ये कचऱ्याला आग लावणे, मोठमोठे खड्डे करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. या विरोधात नागरिकांच्या वतीने आज सकाळी पैठण गेट येथून गार्बेज वॉकचे आयोजन करण्यात आले. 

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीचा आज ६१ वा दिवस असून महापालिका प्रशासन या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. बैठका, निविदा प्रक्रियेतच वेळ वाया घालविण्यात येत आहे. आजही शहरातील विविध वसाहतींमध्ये कचऱ्याला आग लावणे, मोठमोठे खड्डे करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. या विरोधात नागरिकांच्या वतीने आज सकाळी पैठण गेट येथून गार्बेज वॉकचे आयोजन करण्यात आले. 

विविध संघटना, नागरिक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पैठणगेट येथील स्व. गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून सकाळी ९.३० वाजता वॉकला सुरुवात झाली. गुलमंडी, रंगारगल्ली, बुढीलेनमार्गे वॉक महापालिकेवर धडकला. 'नागरिकांचा एकच जागर, स्वच्छ राखू आपल शहर' , शहर मे गंदगी परेशान जिंदगी' अशा आशयाची विविध बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मनपा कार्यालयात महापौर नंदकुमार घोडेले व अतिरिक्त आयुक्त यांनी नागरिकांशी चर्चा केली. ‘गार्बेज वॉक’ मध्ये आमदार सुभाष झांबड, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, औरंगाबाद कनेक्ट टीमचे सारंग टाकळकर, लोकमतचे संपादक सुधीर महाजन, अमनसिंग पवार, समीर राजूरकर, प्रदीप पुरंदरे, श्रीकांत उमरीकर आदींचा सहभाग होता. 

महिना अखेरीस शहर स्वच्छ नागरिकांच्या निवेदनावर बोलताना महापौर व अतिरिक्त आयुक्त यांनी शहरातील संपूर्ण कचरा ३० एप्रिल पर्यंत उचला जाईल असे आश्वासन दिले. यासोबतच मे महिन्या अखेरपर्यंत सर्व झोनमध्ये कचरा प्रक्रिया मशीन्स लावल्या जातील अशी माहिती दिली.  

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpaithan gateपैठण गेट