शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Gandhi Jayanti Special : कचरा डेपोने लातूरकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 11:50 IST

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर.... ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महिन्याला मनपाला कोटींचा खर्च होतोय. तरीपण हजार क्यूबिक मीटरचा कचऱ्याचा ढीग शहरानजीक वरवंटीच्या डेपोवर साचला आहे. यामुळे परिसरातील जनता हैराण आहे. हे कोणालाच कसे दिसत नाही बापू?

- हणमंत गायकवाड

पापाची वासना नको दावू डोळा ।त्याहुनि आंधळा बराच मी ।।निंदेचे श्रवण नको माझ्या कानी ।बधिर करोनी ठेवी देवा ।।अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।त्याहुनि मुका बराच मी ।।

संत तुकारामांनी रचलेल्या या अभंगाची प्रचीती लातूर शहरातून वावरताना दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यात ‘कल्याण-मुंबई’ जोरात आहे. आकड्यांचा हा आजार काही काळ शहरातून गायब होता. तो आता खेड्यापर्यंत पोहोचला; पण हे कोणालाच कसे दिसत नाही? बापूंनी सांगितले म्हणून मी इथे आलो. ‘बुरा मत देखो’ हा माझा वसा. बापूंच्या आदेशाने एक दिवसासाठी मी डोळे उघडले; पण हे काय पाहतोय मी? 

शिक्षण क्षेत्राचा लातूर पॅटर्न या शहराने राज्याला दिला. जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे बापू. खून पाडले जाताहेत. एकाच खोलीत हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे द्रोणाचार्य येथेच आहेत. पाच हजारांपासून पन्नास हजारांपर्यंत शुल्क आहे त्याचे. अकरावी, बारावीच्या शिकवणी वर्गाचा खर्च लाखोंवर गेला आहे. हा शिक्षणाचा बाजार नाही तर आणखी काय आहे बापू? आश्चर्य म्हणजे पालकांनाही याचे काहीच वाटत नाही बापू. वाळूचे दर ५० हजारांपर्यंत गेले आहेत. इथेही टक्केवारी आहे; पण आम्ही ठरवलंय वाईट बघायचंच नाही. ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महिन्याला मनपाला कोटींचा खर्च होतोय. तरीपण हजार क्यूबिक मीटरचा कचऱ्याचा ढीग शहरानजीक वरवंटीच्या डेपोवर साचला आहे. यामुळे परिसरातील जनता हैराण आहे. त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आठवड्यातून दोनदा पाणी देऊ म्हणणारे, आता दहा दिवसाला पाणी देत आहेत. आता तर धरणात पाणीच नाही. बचतीकडेही लक्ष नाही. रेल्वेने पाणी आणण्याचे संकट आमच्यावर येऊ नये असे जनतेला वाटते; पण आम्ही काय करणार, आमच्या डोळ्याला पट्टी आहे. 

छत्रपती शाहू महाराजांचा अर्धाकृती पुतळा शाहू चौकातून मनपाने सुशोभीकरणाच्या नावाखाली हलविला आहे. त्याला जवळपास दोन-चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला. उघडा चबुतरा सुशोभीकरणाची वाट पाहत आहे. समतेची दृष्टी देणाऱ्या राजा छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची ही अवस्था आहे. आम्हाला सत्तेची खुर्ची दिसते; पण समतेची दृष्टी दिसत नाही. कारण आमच्या डोळ्यावर काळी पट्टी आहे. 

कोणालाच कसे काही वाटत नाही?चौका-चौकांनी बॅनर आहेतच. रस्त्यांवर खड्डे, डासोत्पत्ती आणि डेंग्यूच्या उपद्रवामुळे लोक हैराण आहेत. ना धूरफवारणी ना उपाययोजना. जनजागृतीचाही अभाव. हे ना प्रशासनाला दिसते ना राज्यकर्त्यांना. सर्वसामान्यांनाही कसे काही वाटत नाही. 

(लेखक हे ‘लोकमत’च्या लातूर जिल्हा कार्यालयात उपसंपादक आहेत.)

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नlaturलातूर