शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

Gandhi Jayanti Special :मी म्हणतो, हा जिल्हा झालाच कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:27 IST

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... या शहरात जिल्हा मुख्यालय तर आहे; पण ते नावालाच. बसायला माणसेच भरली नाहीत तर ते मुख्यालय घेऊन काय करायचे? रिकाम्या खुर्च्या आणि बिल्डिंग पाहून माघारी फिरतात गोरगरीब बिच्चारे. एक बरे झाले, प्रस्तावित असलेली १२ ते १३ कार्यालये स्थापनच झाली नाहीत. त्यांचीही अवस्था अशीच झाली असती, अगदी स्मशानासारखी. 

- विजय पाटील

आज बापूंची जयंती. दरवर्षी २ आॅक्टोबरला त्यांची आठवण येते. गांधीवादाला सर्व जग सलाम करते. मात्र, वाढती हिंसा पाहून त्यांचे नाव आजच्या पिढीच्या विस्मरणात गेले की काय, असेच मला वाटते. आता मी कोण? बापूंच्या तीन माकडांपैकी एक, ‘बुरा मत कहो’ म्हणणारे. जयंतीच्या निमत्ताने बापूंनी मला हिंगोलीत पाठवले. किती किती कौतुक करावे या शहराचे? हा जिल्हा झालाच कशाला, हा माझा पहिला प्रश्न. वाईट बोलायचे नाही, ही बापूंची शिकवण; पण मी आज बोलणार, तुम्हाला बोलते करण्यासाठी. पुन्हा आपले आहेच तोंडावर बोट. हं, तर सिंचनाचा अनुशेष नाही म्हणायला मंजूर झाला. जिरायतीत राबणारे हात गळफासाऐवजी पाटाचे पाणी वळवतील, असे वाटले होते; पण त्यालाही वीज मिळत नाही. रोहित्र जळाले की, सगळ्या मेहनतीवर पाणी.

एवढे करून बाजार समितीत माल नेला तर भाव नाही. नाव शेतकऱ्यांचे अन् मालक दुसरेच. हमीभाव सोडा साधा भावही नाही. उद्योग तर कुठेच दिसत नाही. शिकायचे सवरायचे अन् ऊसतोड, बांधकामाची कामे करीत गाव सोडायचे, असा इथला तरुण. तरुण बाहेर गेलेल्या गावाचे भविष्य काय ते असणार? कोंबड्या कोंबल्यासारखी वाहनात भरून माणसे नेणारे मुकादम जागोजागी भेटतात. उद्योगपतींपेक्षा त्यांनाच मोठा भाव दिसतो इथे. शिक्षणाचे तर वाटोळेच. उच्चशिक्षणात एक दंत महाविद्यालय दिमाखाने मिरवतेय. अभियांत्रिकीची ओसाड इमारत, दुरवस्थेतील शासकीय शाळा अन् श्रीमंतीच्या सावलीत चालणाऱ्या इंग्रजी शाळा याला काय वैभव म्हणायचे?

पुढाऱ्यांची तर त-हाच वेगळी.  कुणी देशपातळीवर बिझी तर कुणाला जि.प.च्या तीन लाखांच्या कामातही रस. काय वाटेल बापूंना हे सारे ऐकून? सेवाभाव, सकारात्मकता हरवली या शहराची. औषधी, सुविधा अन् डॉक्टरांविना शासकीय रुग्णालयातील आर्त कुणाच्याच कानी कशी पडत नाही? जेमतेम दोनच मोठी तीर्थक्षेत्रे. त्या औंढा व नर्सीचाही विकास नाही. अवैध व्यवसाय अन् महिलांवरील अत्याचारही नित्याचाच. किती किती हे बोलायचे? जो माझा स्वभावच नाही. नाही पाहावत आणि बोलवत हे सारे. नागरिक म्हणून तुम्हालाच याचे काही वाटत नसेल, तर मी माकड तरी काय करणार? फार फार तर हा रिपोर्ट बापूंना सांगणार.  

रस्त्यांबाबत काय बोलावे?  रस्त्यांचा विकास आमदार-खासदारांच्या तोंडून निघणाऱ्या आश्वासनांनीच पूर्ण झाला. प्रत्यक्षात खड्डे अन् पायाला ठेच हेच प्रारब्ध. प्रधानमंत्री ग्रामसडक आता मुख्यमंत्री ग्रामसडक झाली. काय फरक पडला त्यांचा त्यांनाच ठाऊक. खरंच, मुख्यामंत्र्यांचे नाव केले या रस्त्यांनी. 

( लेखक हे ‘लोकमत’चे  हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आहेत.)

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीHingoliहिंगोलीFarmerशेतकरीPoliticsराजकारण