शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Gandhi Jayanti Special :मी म्हणतो, हा जिल्हा झालाच कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:27 IST

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... या शहरात जिल्हा मुख्यालय तर आहे; पण ते नावालाच. बसायला माणसेच भरली नाहीत तर ते मुख्यालय घेऊन काय करायचे? रिकाम्या खुर्च्या आणि बिल्डिंग पाहून माघारी फिरतात गोरगरीब बिच्चारे. एक बरे झाले, प्रस्तावित असलेली १२ ते १३ कार्यालये स्थापनच झाली नाहीत. त्यांचीही अवस्था अशीच झाली असती, अगदी स्मशानासारखी. 

- विजय पाटील

आज बापूंची जयंती. दरवर्षी २ आॅक्टोबरला त्यांची आठवण येते. गांधीवादाला सर्व जग सलाम करते. मात्र, वाढती हिंसा पाहून त्यांचे नाव आजच्या पिढीच्या विस्मरणात गेले की काय, असेच मला वाटते. आता मी कोण? बापूंच्या तीन माकडांपैकी एक, ‘बुरा मत कहो’ म्हणणारे. जयंतीच्या निमत्ताने बापूंनी मला हिंगोलीत पाठवले. किती किती कौतुक करावे या शहराचे? हा जिल्हा झालाच कशाला, हा माझा पहिला प्रश्न. वाईट बोलायचे नाही, ही बापूंची शिकवण; पण मी आज बोलणार, तुम्हाला बोलते करण्यासाठी. पुन्हा आपले आहेच तोंडावर बोट. हं, तर सिंचनाचा अनुशेष नाही म्हणायला मंजूर झाला. जिरायतीत राबणारे हात गळफासाऐवजी पाटाचे पाणी वळवतील, असे वाटले होते; पण त्यालाही वीज मिळत नाही. रोहित्र जळाले की, सगळ्या मेहनतीवर पाणी.

एवढे करून बाजार समितीत माल नेला तर भाव नाही. नाव शेतकऱ्यांचे अन् मालक दुसरेच. हमीभाव सोडा साधा भावही नाही. उद्योग तर कुठेच दिसत नाही. शिकायचे सवरायचे अन् ऊसतोड, बांधकामाची कामे करीत गाव सोडायचे, असा इथला तरुण. तरुण बाहेर गेलेल्या गावाचे भविष्य काय ते असणार? कोंबड्या कोंबल्यासारखी वाहनात भरून माणसे नेणारे मुकादम जागोजागी भेटतात. उद्योगपतींपेक्षा त्यांनाच मोठा भाव दिसतो इथे. शिक्षणाचे तर वाटोळेच. उच्चशिक्षणात एक दंत महाविद्यालय दिमाखाने मिरवतेय. अभियांत्रिकीची ओसाड इमारत, दुरवस्थेतील शासकीय शाळा अन् श्रीमंतीच्या सावलीत चालणाऱ्या इंग्रजी शाळा याला काय वैभव म्हणायचे?

पुढाऱ्यांची तर त-हाच वेगळी.  कुणी देशपातळीवर बिझी तर कुणाला जि.प.च्या तीन लाखांच्या कामातही रस. काय वाटेल बापूंना हे सारे ऐकून? सेवाभाव, सकारात्मकता हरवली या शहराची. औषधी, सुविधा अन् डॉक्टरांविना शासकीय रुग्णालयातील आर्त कुणाच्याच कानी कशी पडत नाही? जेमतेम दोनच मोठी तीर्थक्षेत्रे. त्या औंढा व नर्सीचाही विकास नाही. अवैध व्यवसाय अन् महिलांवरील अत्याचारही नित्याचाच. किती किती हे बोलायचे? जो माझा स्वभावच नाही. नाही पाहावत आणि बोलवत हे सारे. नागरिक म्हणून तुम्हालाच याचे काही वाटत नसेल, तर मी माकड तरी काय करणार? फार फार तर हा रिपोर्ट बापूंना सांगणार.  

रस्त्यांबाबत काय बोलावे?  रस्त्यांचा विकास आमदार-खासदारांच्या तोंडून निघणाऱ्या आश्वासनांनीच पूर्ण झाला. प्रत्यक्षात खड्डे अन् पायाला ठेच हेच प्रारब्ध. प्रधानमंत्री ग्रामसडक आता मुख्यमंत्री ग्रामसडक झाली. काय फरक पडला त्यांचा त्यांनाच ठाऊक. खरंच, मुख्यामंत्र्यांचे नाव केले या रस्त्यांनी. 

( लेखक हे ‘लोकमत’चे  हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आहेत.)

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीHingoliहिंगोलीFarmerशेतकरीPoliticsराजकारण