शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

Gandhi Jayanti Special :मी म्हणतो, हा जिल्हा झालाच कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 12:27 IST

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... या शहरात जिल्हा मुख्यालय तर आहे; पण ते नावालाच. बसायला माणसेच भरली नाहीत तर ते मुख्यालय घेऊन काय करायचे? रिकाम्या खुर्च्या आणि बिल्डिंग पाहून माघारी फिरतात गोरगरीब बिच्चारे. एक बरे झाले, प्रस्तावित असलेली १२ ते १३ कार्यालये स्थापनच झाली नाहीत. त्यांचीही अवस्था अशीच झाली असती, अगदी स्मशानासारखी. 

- विजय पाटील

आज बापूंची जयंती. दरवर्षी २ आॅक्टोबरला त्यांची आठवण येते. गांधीवादाला सर्व जग सलाम करते. मात्र, वाढती हिंसा पाहून त्यांचे नाव आजच्या पिढीच्या विस्मरणात गेले की काय, असेच मला वाटते. आता मी कोण? बापूंच्या तीन माकडांपैकी एक, ‘बुरा मत कहो’ म्हणणारे. जयंतीच्या निमत्ताने बापूंनी मला हिंगोलीत पाठवले. किती किती कौतुक करावे या शहराचे? हा जिल्हा झालाच कशाला, हा माझा पहिला प्रश्न. वाईट बोलायचे नाही, ही बापूंची शिकवण; पण मी आज बोलणार, तुम्हाला बोलते करण्यासाठी. पुन्हा आपले आहेच तोंडावर बोट. हं, तर सिंचनाचा अनुशेष नाही म्हणायला मंजूर झाला. जिरायतीत राबणारे हात गळफासाऐवजी पाटाचे पाणी वळवतील, असे वाटले होते; पण त्यालाही वीज मिळत नाही. रोहित्र जळाले की, सगळ्या मेहनतीवर पाणी.

एवढे करून बाजार समितीत माल नेला तर भाव नाही. नाव शेतकऱ्यांचे अन् मालक दुसरेच. हमीभाव सोडा साधा भावही नाही. उद्योग तर कुठेच दिसत नाही. शिकायचे सवरायचे अन् ऊसतोड, बांधकामाची कामे करीत गाव सोडायचे, असा इथला तरुण. तरुण बाहेर गेलेल्या गावाचे भविष्य काय ते असणार? कोंबड्या कोंबल्यासारखी वाहनात भरून माणसे नेणारे मुकादम जागोजागी भेटतात. उद्योगपतींपेक्षा त्यांनाच मोठा भाव दिसतो इथे. शिक्षणाचे तर वाटोळेच. उच्चशिक्षणात एक दंत महाविद्यालय दिमाखाने मिरवतेय. अभियांत्रिकीची ओसाड इमारत, दुरवस्थेतील शासकीय शाळा अन् श्रीमंतीच्या सावलीत चालणाऱ्या इंग्रजी शाळा याला काय वैभव म्हणायचे?

पुढाऱ्यांची तर त-हाच वेगळी.  कुणी देशपातळीवर बिझी तर कुणाला जि.प.च्या तीन लाखांच्या कामातही रस. काय वाटेल बापूंना हे सारे ऐकून? सेवाभाव, सकारात्मकता हरवली या शहराची. औषधी, सुविधा अन् डॉक्टरांविना शासकीय रुग्णालयातील आर्त कुणाच्याच कानी कशी पडत नाही? जेमतेम दोनच मोठी तीर्थक्षेत्रे. त्या औंढा व नर्सीचाही विकास नाही. अवैध व्यवसाय अन् महिलांवरील अत्याचारही नित्याचाच. किती किती हे बोलायचे? जो माझा स्वभावच नाही. नाही पाहावत आणि बोलवत हे सारे. नागरिक म्हणून तुम्हालाच याचे काही वाटत नसेल, तर मी माकड तरी काय करणार? फार फार तर हा रिपोर्ट बापूंना सांगणार.  

रस्त्यांबाबत काय बोलावे?  रस्त्यांचा विकास आमदार-खासदारांच्या तोंडून निघणाऱ्या आश्वासनांनीच पूर्ण झाला. प्रत्यक्षात खड्डे अन् पायाला ठेच हेच प्रारब्ध. प्रधानमंत्री ग्रामसडक आता मुख्यमंत्री ग्रामसडक झाली. काय फरक पडला त्यांचा त्यांनाच ठाऊक. खरंच, मुख्यामंत्र्यांचे नाव केले या रस्त्यांनी. 

( लेखक हे ‘लोकमत’चे  हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आहेत.)

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीHingoliहिंगोलीFarmerशेतकरीPoliticsराजकारण