शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

Gandhi Jayanti Special : चंपावतीनगरीच्या चौकीदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 11:42 IST

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर.... पुरुषप्रधान संस्कृती असली तर या नगरीवर आतापर्यंत केशरकाकू  क्षीरसागर, विमल मुंदडा, रजनीताई पाटील, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. संगीता ठोंबरे, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हारपासून ते ग्रामविकासमंत्री पंकजा मुंंडे यांच्यापर्यंत सर्वच महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली. 

- सतीश जोशी

बापूंच्या तीन भावंडांमधला ‘बुरो मत सुनो’वाला मी. बापूंच्याच आदेशानुसार बीड अशी ओळख असलेली चंपावतीनगरी मी गाठली. इथे नेहमीच राजकीय भूकंप होत असतात. कधी परळी तर कधी आष्टी हा या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू असतो. अधूनमधून बीडमधून धक्के देऊन ताकद दाखवली जाते. मी परळीमागे जिल्ह्यात प्रवेश मिळवला. वैद्यनाथाचे दर्शन घेतले. अनाहूत पाहुणा पाहून आपल्यात वाटेकरी वाढला, अशी भावना त्यांच्या  चेहऱ्यावर दिसत होती.  लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आपल्यात नाहीत, याचे दु:ख भक्तांच्या चर्चेत होते. भगवानगडाबद्दल जो आज वाद निर्माण केला जात आहे, याचीही खंत त्यांना बोचत होती. बापूंच्या आदेशानुसार मी शांतपणे ऐकत होतो. मध्येच कुणीतरी परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचा विषय काढला. घोषणेप्रमाणे २०१९ पर्यंत हा मार्ग सुरू होणार नाही, यावर एकमत झाले. ताईच्या समर्थकाला हे आवडले नाही. त्याने लगेच जगमित्र नागा सूतगिरणीचा विषय काढला आणि दोघेही गप्प झाले.

मुंडेसाहेबांप्रमाणे पंकजाताई संपर्क ठेवत नाहीत, असे कोणीतरी बोलले. गळ्यात शबनम असलेल्या पत्रकाराने मध्येच तोंड घातले. अहो, तुमचे सोडून द्या, आम्हा पेपरवाल्यांशीही त्यांचा महिनोमहिने संपर्क होत नाही. मध्येच दुसऱ्याने शर्टाच्या बाह्या वर करीत ‘आमच्या खासदार डॉ. प्रीतमतार्इंबदल बोलाना’ असे आव्हान दिले. हो बाबा खरे आहे, असे म्हणत तिसऱ्याने प्रीतमतार्इंप्रमाणे पंकजातार्इंना आपण मनमोकळेपणाने बोलतोत का,  असा सवाल केला.वाद हातघाईवर येत असल्याचे लक्षात येताच मी तिथून अंबाजोगाई जवळ केली आणि थेट अंबा योगेश्वरीचे दर्शन घेतले. इथेही राजकीयच गप्पा होत्या. कुणीतरी म्हणाले,  माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांचा हा बालेकिल्ला. दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर त्यांनी एकछत्री अंमल केला. त्यांच्या निधनानंतर भाजपच्या डॉ. संगीता ठोंबरे या नव्या चेहऱ्याने निवडणूक जिंकलीच नाही तर मुंदडांच्या कार्यपद्धतीवर वाटचाल सुरू आहे. त्यांनी आणखी संपर्क वाढवायला पाहिजे, असाही कुणीतरी सल्ला देऊन टाकला.  बीड जवळ  करायचे असल्यामुळे तिथून सटकलो.

बीड वळणरस्ता आणि बिंदुसरा नदीवरील पुलाच्या कामावरून इथे आ. विनायक मेटे आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यात श्रेयवादाची लढाई झाली, आरोप-प्रत्यारोपाचे बरेचसे पाणी या पुलाखालून वाहून गेले, असे कुणीतरी मला सांगितले होते. ३५ वर्षांपासून बीड पालिकेवर क्षीरसागरांचीच सत्ता. कौटुंबिक कलहात गेल्या एक वर्षाचा अपवाद सोडला तर पालिकेवर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचेच राज्य. शहरात जिकडे-तिकडे साचलेल्या कचऱ्याचे ढीग दिसत होते. नाकावर हात ठेवूनच भटकत होतो. नाट्यगृहाजवळील मैदानात गर्दी दिसली. कानोसा घेतला तेव्हा कुणीतरी बारामतीचे मोठे पवारसाहेब आल्याचे सांगत होते. जयदत्त अण्णाने जिल्ह्यातीलच काय बारामतीच्या धाकट्या दादासाहेबांनाही जुमानले नाही. साहेबांनी दोन दिवस अगोदर नाशिकच्या छगन भुजबळांना पाठवून अण्णांची समजूत काढली. एकमेकांची समजूत काढण्यात हे दोघेही निष्णात आहेत, याचे अनुभव पवारसाहेबांना अनेक आले, असं कुणीतरी म्हणालं.

सर्वकाही ओके झाल्यावर पवार साहेब आले. रुसलेले अण्णाही हसले. आधी अण्णा दीड वर्षापासून पक्षापासून दूर आहेत, अशी कागाळी करणारी मंडळी अण्णा पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय झाल्यामुळे कसे परेशान झालेत, याचे विश्लेषण कानावर पडत होते. पुतण्या संदीपचे काय होणार? अशी चिंताही कुणीतरी व्यक्त केली. या राजकीय गप्पांचा आता कंटाळा आला होता. पुन्हा कानावर हात ठेवून बापूंना मनातल्या मनात अभिवादन केले आणि परतीचा प्रवास सुरू केला. 

मर्जीतल्या लोकांची गुत्तेदारीसाठेचौकातून सुभाष रोडमार्गे जात असताना एके ठिकाणी गर्दी दिसली. कानोसा घेतला तर कुणीतरी घसरून पडले असे सांगत होता. असे प्रकार नेहमीच घडतात, अशी कुणीतरी पुष्टी जोडली. मर्जीतल्या गुत्तेदाराने हे काम किती निकृष्ट केले. पेव्हर ब्लॉक दोन महिन्यातच खराब झाल्यामुळे दररोज अपघात होत आहेत, असंही कुणीतरी रागानं ओरडलं. 

(लेखक हे ‘लोकमत’चे बीड जिल्हा प्रतिनिधी आहेत.) 

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा