शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कोट्यातून एमबीबीएस प्रवेश याचिकांची सुनावणी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:36 IST

उद्या निकाल अपेक्षित; सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानुसारच प्रवेश मिळणार

औरंगाबाद : एमबीबीएस प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ‘अनिवासी भारतीयांच्या’ (एनआरआय) कोट्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘राज्याच्या कोट्यातून’ (स्टेट कोटा) प्रवेश देण्याची आणि पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्याची विनंती करणाºया याचिकांवरील सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पूर्ण झाली. न्या.आर. एम. बोर्डे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी सर्व याचिका निकालासाठी राखून ठेवल्या. निकाल २३ आॅगस्ट रोजी अपेक्षित आहे.सुनावणीच्या वेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे हजर होते. खंडपीठाने प्रवेश नियमावलीतील विविध नियमांबाबत ‘सीईटी’ सेल आणि राज्य शासनाकडून माहिती घेतली. एमबीबीएस प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालानुसार आणि प्रवेश नियमानुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील, असे मंगळवारच्या सुनावणीअंती स्पष्ट झाले. सीईटी सेलने एमबीबीएस प्रवेशाच्या दुसºया फेरीची गुणवत्ता यादी १२ आॅगस्टला जाहीर केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत शनिवारची होती. विद्यार्थ्यांनी १८ आॅगस्टला निवड झालेल्या कोट्यातून प्रवेश घेतले नाही, तर ते पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार होते. उपरोक्त गुणवत्ता यादीत ज्यांची निवड ‘अनिवासी भारतीयांच्या’ कोट्यातून झाली आहे. त्यांनी औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल करून त्यांना ‘राज्याच्या कोट्यातून’ (स्टेट कोटा) प्रवेश देण्याची आणि पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्याची विनंती केली.याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार राज्य कोटा आणि अनिवासी भारतीय कोट्यातील विद्यार्थ्यांच्या फीमध्ये ढोबळमानाने चार ते पाच पटींचा फरक आहे. राज्य शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सिद्धार्थ यावलकर, सीईटी सेलतर्फे अ‍ॅड. मृगेश नरवाडकर आणि अ‍ॅड. सुजित कार्लेकर, केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे आदींनी काम पाहिले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद