सातारावासीयांचा न.प.वर मोर्चा
By Admin | Updated: January 4, 2015 01:13 IST2015-01-04T00:59:22+5:302015-01-04T01:13:44+5:30
औरंगाबाद : पाडापाडीपेक्षा परिसरातील विकासकामांना प्राधान्य द्या, साताऱ्याचे खिंडार करू नका, दंडात्मक वसुली करून मालमत्ता कायम करा, अशा घोषणांनी काँग्रेसच्या मोर्चाने सातारा- देवळाई परिसर दुमदुमला.

सातारावासीयांचा न.प.वर मोर्चा
औरंगाबाद : पाडापाडीपेक्षा परिसरातील विकासकामांना प्राधान्य द्या, साताऱ्याचे खिंडार करू नका, दंडात्मक वसुली करून मालमत्ता कायम करा, अशा घोषणांनी काँग्रेसच्या मोर्चाने सातारा- देवळाई परिसर दुमदुमला.
संकटमोचन हनुमान मंदिरापासून निघालेला हा मोर्चा नगर परिषदेवर धडकला. यावेळी माजी जि.प. अध्यक्षा नाहिदाबानो पटेल, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज पटेल, ज्येष्ठ नेते करीम पटेल, माजी पंचायत समिती सदस्य जावेद पटेल, अशोक तीनगोटे, सोमीनाथ शिराणे, अरुण पाटील, नामदेव बाजड, रोहन पवार, भरत चौरे, हरिभाऊ राठोड यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सातारा- देवळाईतील रस्ते, ड्रेनेजलाईन, कचरा संकलन व विल्हेवाट, स्वच्छ पाणी, पथदिवे, दूषित पाण्याची विल्हेवाट, एनए-४७ बीचा प्रश्न, सिडकोकडील जमा महसूल विकासकामासाठी आणणे, घर कायम करणे, खुल्या जागांचे अतिक्रमण काढून भूखंड ताब्यात घ्यावेत, सर्व्हिस रोड मोकळा करा अशा मागण्या मांडल्या. तुमच्या भावना वरिष्ठांसमोर मांडणार असल्याचे आश्वासन मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी दिले. मोर्चात मुक्तार पटेल, स्वप्नील अकोलकर, अॅड. क्षितिज रोडे, उमाकांत पाटील, बंडू पारखे, ज्ञानेश्वर पोपळघट, सुभाष पाटील वाघ, नामदेव सोनवणे, शकील पटेल, सलीम पटेल, रंगनाथ आरते, सुशील तवार, अफसर बेग, सुवर्णा पाटील, मीनाक्षी पवार, अरुणा पाटील, उषा तवार, शकील पटेल, छोटू पटेल, रूपाली शिंदे, सुनंदा ढवळे, भारती पाटील, आशा माळी, प्रतिभा खंडागळे, सुनीता बिराजदार, कुसुम गोर्डे, वृषाली शेलार, नंदा खंडागळे उपस्थित होते.