शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचा मोर्चा

By admin | Updated: March 26, 2015 00:56 IST

लातूर : महा- आॅनलाईन कंपनीने संगणक परिचालकांवर अन्यायच केला आहे. मानधन देण्यास चालढकल तसेच नियमित मानधन न देणे असे प्रकार सुरू आहेत

लातूर : महा- आॅनलाईन कंपनीने संगणक परिचालकांवर अन्यायच केला आहे. मानधन देण्यास चालढकल तसेच नियमित मानधन न देणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे ई-पंचायत धोरणाला गालबोट लागत आहे. त्यामुळे कंपनीसोबतचा करार रद्द करून संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या सेवेत घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत संगणक परिचालक कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.लातूर जिल्ह्यात ७८७ ग्रामपंचायतींमध्ये ६५० संगणक परिचालक काम करतात. ग्रामपंचायतींचे आॅनलाईन कामकाज याच संगणक परिचालकांवर आहे. मात्र आॅनलाईन कंपनी या परिचालकांचे मानधन नियमित देत नाही. मागील तीन वर्षांपासूनचे मानधन थकित आहे. तसेच इंटरनेटचे बिलही तीन वर्षांपासून थकित आहे. त्यामुळे ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महा-आॅनलाईन कंपनीसोबतचा करार शासनाने रद्द करून ग्रामपंचायत संगणक परिचालक कामगारांना जिल्हा परिषदेच्या सेवेत घ्यावे, अशी मागणी परिचालक कामगार संघटनेच्या वतीने जि.प.च्या सीईओंकडे करण्यात आली आहे. २३ मार्चपासून काम बंद आंदोलन आहे. बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर पार्क येथून निघालेला मोर्चा दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेवर धडकला. यावेळी सीईओंना आंदोलकांनी निवेदन दिले. या आंदोलनात शिवशंकर सोमवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रदीप माने, विशाल लांडगे आदी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी) ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत अंतर्गत संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) हा प्रकल्प चालू करण्यात आला. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर राज्यात २७ हजार संगणक परिचालकांची कंत्राटी नियुक्ती केली. परंतु, या परिचालकांच्या मानधनातून महा-आॅनलाईन कंपनीने आतापर्यंत ४५० कोटी रुपये हडप केले, असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.