शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

११ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या जड वाहनांना ‘औट्रम घाटातून’ वाहतुकीस बंदी

By प्रभुदास पाटोळे | Updated: August 5, 2023 14:00 IST

वाहतूककोंडी रोखण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर : वाहतूककोंडी रोखण्यासाठी सोलापूर-धुळे महामार्ग क्रमांक २११ वरील औट्रम घाटातून सर्व प्रकारच्या जड वाहनांना खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी ११ ऑगस्ट २०२३ पासून बंदी घातली आहे. शिवाय वन आणि वन्यप्राण्यांना नुकसान होऊ नये, यासाठी गौताळा अभयारण्यातून पर्यायी मार्गाला परवानगी देण्यास खंडपीठाने नकार दिला.

सर्व जड वाहने, मल्टी एक्सल वाहने, ट्रक, दूध, एलपीजी, पेट्रोल, डिझेल आदींची वाहतूक करणारे टँकर, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस या जड वाहनांना खंडपीठाने ११ ऑगस्टपासून बंदी घातली. या आदेशाबाबत प्रतिवादी छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचे परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.) आणि या दोन्ही जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक, तसेच चाळीसगावचे पोलिस उपअधीक्षक यांना जनजागृतीसाठी ११ ऑगस्टपर्यंत ७ दिवसांचा वेळ खंडपीठाने दिला आहे.

जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गऔट्रम घाटाकडे न जाता याचिकाकर्त्यांनी सुचविल्यानुसार चाळीसगावकडे, तसेच मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर-दौलताबाद टी पॉइंट-रंगारी देवगाव-शिऊर बंगला-वाकला-पिंपरखेड-न्यायडोंगरी मार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाला, तसेच नांदगावहून मालेगाव मार्गे मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाण्यास खंडपीठाने परवानगी दिली.

महसुलापेक्षा लोकांच्या सोयी महत्त्वाच्यापर्यायी मार्गाने वाहतूक वळविल्यास ‘टोल’ (महसूल)चे नुकसान होईल, असा मुद्दा सुनावणीदरम्यान ‘एनएचएआय’चे वकील सुहास उरगुंडे यांनी उपस्थित केला असता वाहतूककोंडीमुळे अपघात होतात. गुन्हे घडतात, लोकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. यामुळे महसुलापेक्षा लोकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. गुरुवारी औट्रम घाटात झालेल्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी रात्रभर घाटात अडकल्याच्या घटनेची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. सोलापूर-धुळे महामार्गाच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाला खंडपीठाने परवानगी दिली. याचिकाकर्ते ॲड. ज्ञानेश्वर बागूल, ॲड. नीलेश देसले आणि ॲड. श्रीकृष्ण चौधरी, तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पाहिले.

औट्रम घाटातून केवळ याच वाहनांना वाहतुकीची परवानगीशेतकऱ्यांची हलकी वाहने, ट्रॅक्टर, दुचाकी, जीप, महाराष्ट्र आणि परराज्यांच्या परिवहन खात्याच्या प्रवासी बस, रुग्णवाहिका, अग्निशमन विभागाची वाहने, तसेच घाटात एखादे वाहन अडकले असेल तर ते काढण्यासाठी क्रेन आणि आपत्कालीन काळात पॅरा मिल्ट्रीची वाहने आणि पोलिसांची वाहने यांनाच ११ ऑगस्टनंतर चाळीसगावकडे जाणाऱ्या औट्रम घाटातून वाहतुकीची परवानगी असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादAccidentअपघात