शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

...आता फुकट्या प्रवाशांना भरावा लागणार १८ टक्के ‘जीएसटी’सह दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 7:38 PM

विनातिकीट प्रवास केल्यास 'प्रवास भाडे, दंड अधिक १८ टक्के ‘जीएसटी’

औरंगाबाद : ‘एसटी’तून विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यास, यापुढे केवळ दंडाची रक्कम भरून भागणार नाही. तर दंडाच्या रकमेवर १८ टक्के वस्तू व सेवाकर (जीएसटी) फुकट्या प्रवाशांना मोजावा लागणार आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास नको, अशी म्हणण्याचीच वेळ प्रवाशांवर येणार आहे.

एक देश- एक करप्रणालीअंतर्गत १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवाकर प्रणाली लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही जीएसटीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. महाराष्ट्राने करभरणा करण्यात देशात अव्वलस्थान पटकावले. या सगळ्यात एसटी महामंडळानेही वस्तू व सेवाकर लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा कर चक्क दंडावर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

एसटी महामंडळाकडून बसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात येतो. या दंडावर जीएसटी लागू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेवर १८ टक्के वस्तू व सेवाकर वसूल करण्यात यावा, अशी सूचना महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (वाहतूक)  विभाग नियंत्रकांना केली आहे. 

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांक डून किमान दंड म्हणून १०० रुपये किंवा चुकविलेल्या प्रवास भाड्याच्या दुप्पट यापैकी जी रक्कम अधिक असेल ती रक्कम आणि प्रवासाचे भाडे वसूल करण्यात येते. यापुढे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना याशिवाय १८ टक्के ‘जीएसटी’ची रक्कमदेखील मोजावी लागणार आहे. याबरोबरच पोलीस आणि आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून वाहने जप्त करून बसस्थानकाच्या आगारात उभी केली जातात. या वाहन मालकांकडून वसूल करण्यात येणाऱ्या भू-भाड्याच्या रकमेवरही १८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

...अशी होईल वसुलीकिमान दंड असलेल्या १०० रुपयांवर १८ टक्के जीएसटी लावून ११८ रुपये होतात. ‘एसटी’कडून ५ च्या पटीत रक्कम आकारण्यात येते. त्यानुसार १२० रुपये मोजावे लागतील. तसेच तिकिटाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून वसूल करायची झाल्यासही जीएसटी लावला जाईल.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनpassengerप्रवासी